वृत्तसंस्था
बँकॉक : जागतिक बॅडमिंटन खेळात सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या थॉमस कप स्पर्धेत भारताने सत्तर वर्षांनंतर इतिहास रचला आहे. थॉमस कप २०२२ च्या फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाने सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप २०२२ चे विजेतेपद पटकावले आहे. भारताने ऑलिंपिक मधल्या खेळांवर प्रशिक्षणापासून ते सुविधांपर्यंत खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित केल्याचे हे फळ मिळाले आहे. The story of the history made by India by defeating 4 time winners Indonesia
थॉमस कपच्या 70 वर्षांच्या इतिहासात भारत कधीच फायनल पर्यंत गेला नव्हता. 1952, 1957 आणि 1979 या तीन वर्षात भारत फक्त सेमीफायनल पर्यंत पोहोचला होता. परंतु इंडोनेशिया, तैवान आधी देशांकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. 2022 मध्ये पहिल्यांदाच भारत थॉमस कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आणि भारतीय टीमने प्रत्येक सामने जिंकत 14 वर्षे चॅम्पियन राहिलेल्या इंडोनेशियाला पराभवाची धूळ चारली. या अर्थाने भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात सध्याच्या टीमने आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App