यानिमित्त जाणून घेऊयात जम्मू-काश्मिरमध्ये नेमके काय बदल झाले आणि कशी आहे परिस्थिती?
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : चार वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, ज्याने जम्मू-काश्मीरचे चित्र बदलून टाकले. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 (अनुच्छेद 370) रद्द केले. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. आता ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा डौलाने फडकताना दिसत आहे. The historic decision to remove Article 370 from Jammu and Kashmir has completed four years today
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय, आर्थिक आणि विकासात्मक बदल झाले आहेत. आता जम्मू हे देशातील इतर राज्यांसारखे झाले आहे. दहशतवादी घटनांमध्येही घट झाली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अहवालानुसार राज्यात गुंतवणूक आणि व्यवसायात वाढ झाली आहे. सुमारे 30 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 2 एम्स रुग्णालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
दहशतवादी कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात आज लोक शांततेत आणि आनंदाने राहत आहेत, इथे बॉम्बस्फोटांऐवजी आता संगीताचे स्वर कानी पडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर चित्रपट संस्कृती पुन्हा सुरू झाली. शोपियान, पुलवामा, कुपवाडा, कुलगाम, बारामुल्ला आणि श्रीनगरमध्ये सिनेमा हॉल सुरू झाले आहेत.
या भागात पर्यटनालाही चालना मिळाली असून राज्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यंदा अमरनाथ भक्तांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्याचवेळी तब्बल 34 वर्षांनंतर मोहरमची मिरवणूक काढण्यात आली. हळूहळू येथील जनजीवन पूर्वपदावर येताना स्पष्टपणे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App