वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 29 मार्चपासून देशात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी (29 मार्च) राज्यातील सोनमर्गच्या हँग भागात हिमस्खलन झाला. त्यामुळे दोन गाड्या बर्फात अडकल्या. कारमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. मात्र, हिमस्खलनामुळे श्रीनगर-लेह महामार्ग बंद करण्यात आला आहे. snowfall in Kashmir, Srinagar-Leh highway closed due to avalanche
भारतीय हवामान खात्याने (IMD) जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये 30 मार्च रोजी मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. 19 राज्यांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. येथे ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
याशिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओडिशा आणि सिक्कीममध्ये ढगाळ वातावरण राहील. या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन शहरे सर्वाधिक उष्ण
दुसरीकडे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. देशातील 5 सर्वात उष्ण शहरांमध्ये 4 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आहेत. अकोला येथे 29 मार्च रोजी 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. संपूर्ण देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
यानंतर मध्य प्रदेशातील मोहा आणि गुणा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तापमानाच्या बाबतीत आंध्र प्रदेशातील नंदयाला चौथ्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील परभणी पाचव्या स्थानावर आहे. या सर्व शहरांमध्ये पारा 40 अंशांच्या वर नोंदला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App