‘भारत चंद्रावर पोहोचला, आपण जमिनीवरच स्वतःला सांभाळू शकलो नाही…’

Nawaz Sharif
  • नवाझ शरीफ यांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाले अधपतनास आम्हीच जबाबदार

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा चांद्रयान-३ मोहिमेसाठी भारताचे कौतुक केले आहे. शरीफ म्हणाले की, ‘आपला शेजारी चंद्रावर पोहोचला आहे, पण पाकिस्तानमध्ये आपण अजूनही जमिनीवर नीट उभे राहू शकलो नाही. हे असेच चालू शकत नाही.’India reached the moon we could not sustain ourselves on the ground Nawaz Sharif



शरीफ म्हणाले की, ‘आमच्या अधोगतीला आम्हीच जबाबदार आहोत, अन्यथा हा देश वेगळ्या ठिकाणी पोहोचला असता.’ शरीफ यांचे हे वक्तव्य त्यांच्या विधानाच्या एका दिवसानंतर आले आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेला भारतही नाही आणि अमेरिकाही जबाबदार नाही.

नवाझ शरीफ म्हणाले की, ‘आज पाकिस्तान अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जिथे पोहोचला आहे, ते भारत, अमेरिका किंवा अफगाणिस्ताननेही केलेले नाही. खरं तर आम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. 2018 च्या निवडणुकीत हेराफेरी करून देशावर सरकार लादण्यात आले. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला आणि अर्थव्यवस्था कोलमडली.’

पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ चौथ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीफ यांनी भारताबाबत मवाळ आणि पुरोगामी भूमिका स्वीकारणे काही नवीन नाही. जेव्हा भारताने चंद्राच्या दक्षिणेकडे चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली तेव्हा शरीफ यांनी दोन्ही देशांमधील तुलना केली होती.

India reached the moon we could not sustain ourselves on the ground Nawaz Sharif

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub