निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी, मागण्यांची सादर केली यादी, प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी; भाजपचीही कुरघोडी!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी मागणीची सादर केली यादी प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी, पण भाजपचीही पुरवणी असेच कालच्या रात्रीच्या निवडणूक आयोगाच्या भेटीगाठींचे वर्णन करावे लागेल. INDI alliance leaders and BJP leaders met election commission separately

काँग्रेसच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण एक्झिट पोलचा निष्कर्ष नाकारला. त्या पाठोपाठ प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वी “इंडी” आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी सायंकाळी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यात निवडणूक आयोगाकडे 5 मागण्या केल्या. “इंडी” आघाडीचे शिष्टमंडळ निघून गेल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचले. “इंडी” आघाडी आणि भाजप आघाडी या दोन्ही आघाड्यांनी निवडणूक आयोगाकडे परस्परांना छेद देणाऱ्या मागण्या केल्या आहेत.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागण्यांची माहिती

अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. ते म्हणाले, ‘आम्ही आघाडीचे नेते तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाकडे एकत्र आलो आहोत. आम्ही आमची चिंता निवडणूक आयोगाकडे व्यक्त करून 5 मागण्या केल्या त्या अशा :

  •  पोस्टल बॅलेटचे निकाल ईव्हीएम निकालापूर्वी जाहीर करावेत.
  •  मोजणी नियमानुसार केली पाहिजे, पर्यवेक्षकांनी या नियमांची अंमलबजावणी करावी.
  •  मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले पाहिजे आणि कंट्रोल युनिटची पडताळणी करावी.
  •  मशीनमधून येणारा डेटा निश्चित केला पाहिजे.
  •  ईव्हीएम सील केल्यावर त्याची पडताळणी करण्यासाठी मोजणी एजंट असतात. मतमोजणी दरम्यान याची खात्री करावी.

“इंडी” आघाडीच्या शिष्टमंडळात अभिषेक मनू सिंघवी, डी राजा, राम गोपाल यादव, संजय यादव, नासिर हुसेन, सलमान खुर्शीद आणि सीताराम येचुरी यांचा समावेश होता.

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, अनेकदा असे घडले आहे की सर्व पक्षांच्या मतांमध्ये पोस्टल मतपत्रिकांमधील फरक दोन ते तीन पट आहे. पोस्टल मतपत्रिका निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरतात. पोस्टल मतपत्रिका आधी मोजल्या जातील, असा निवडणूक आयोगाचा नियम आहे. म्हणजेच ईव्हीएमच्या मोजणीपूर्वी मतपत्रिका मोजल्या जातील.

सिंघवी म्हणाले की, आमची निवडणूक आयोगाकडे तक्रार होती की, आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे आणून हा नियम बदलला आहे, जे कायद्यानुसार करता येत नाही. कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे आणून नियम बदलता येणार नाही. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी ईव्हीएम निकाल देता येणार आहे.

निवडणूक निकालात बदल करणाऱ्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी ईव्हीएमपूर्वी पूर्ण करावी, अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी होती. तसेच, लेव्हल प्लेइंग फिल्डसाठी, लोकशाहीसाठी, मुक्त निवडणुकांसाठी जुन्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले – आम्ही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कडक देखरेखीची मागणी केली असून निवडणूक आयोगाने आम्हाला समाधानकारक उत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही नियमावर शंका घेतली नाही, परंतु हे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची खात्री केली.

भाजप नेत्यांचीही निवडणूक आयोगाची भेट

“इंडी” आघाडीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. पियुष गोयल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष INDI आघाडीच्या पक्षांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. या भक्कम निवडणूक प्रक्रियेवर या पक्षांनी मिळून जे आरोप केले आहेत, तो या लोकशाही संस्थेवरचा हल्ला आहे.

त्यादृष्टीने आम्ही निवडणूक आयोगाकडे मागण्या मांडल्या आहेत. आमची पहिली मागणी आहे की मतमोजणीत गुंतलेल्या प्रत्येक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला त्याची प्रक्रिया चांगली माहिती असावी आणि निवडणूक आयोगाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. दुसरे म्हणजे, मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित केली जावी. तिसरे, निवडणूक प्रक्रिया बिघडवण्याच्या सततच्या प्रयत्नांची दखल घ्या आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा.

INDI alliance leaders and BJP leaders met election commission separately

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात