वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संसदेमध्ये विरोधकांनी जास्तीत जास्त अवघड आणि टोकदार प्रश्न विचारून सरकारला जेरीस आणावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे. पण त्याचवेळी विरोधकांनी सरकारची उत्तरे ऐकण्याची देखील तयारी ठेवावी. सरकारला उत्तरे देण्याची मूभा द्यावी, असे आवाहन आणि आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले.Hit the government in Parliament, but also listen to the government’s answers… !!; Prime Minister Modi’s appeal and challenge to the opposition
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात झाली. त्यापूर्वी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना मोदींनी विरोधकांना आवाहन केले आणि आव्हानही दिले.
ते म्हणाले, की सरकार विरोधकांचा एकही प्रश्न अनुत्तरीत ठेवणार नाही. पण विरोधकांनी संसदीय नियमांचे पालन करून शिस्त पाळून सरकारी उत्तरे ऐकून घेतली पाहिजेत. संसदेच्या सर्व पक्षांच्या सदस्यांनी नियमांचे पालन करून सरकारवर टीकेचा भडिमार केला तरी चालेल. आम्ही ते ऐकून घेऊ आणि मग उत्तरे देऊ. पण त्यावेळी विरोधकांनी देखील सरकारची उत्तरे ऐकून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एक गमतीशीर वक्तव्य करून संसदेत हलके फुलके वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की देशातले ४० कोटी कोरोनाविरुध्दच्या लढाईत आता बाहुबली बनलेत. कारण कोरोनाची लस बाहूमध्ये म्हणजे दंडावर देण्यात येते.
I would like to urge all the MPs & all the parties to ask the most difficult & sharpest questions in the Houses but should also allow the Govt to respond, in a disciplined environment. This will boost the democracy, strengthen people's trust & improve pace of development: PM Modi pic.twitter.com/eG6FoqTcl8 — ANI (@ANI) July 19, 2021
I would like to urge all the MPs & all the parties to ask the most difficult & sharpest questions in the Houses but should also allow the Govt to respond, in a disciplined environment. This will boost the democracy, strengthen people's trust & improve pace of development: PM Modi pic.twitter.com/eG6FoqTcl8
— ANI (@ANI) July 19, 2021
बाहूमध्ये लस घेऊन ४० कोटी लोक बाहुबली बनलेत, असे विधान त्यांनी केले. कोरोनाने सगळे जग वेढले आहे. भारताने त्याविरोधात प्रभावी उपाययोजना केली आहे. त्यामुळे संसदेत या विषयावर अर्थपूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनावरच्या चर्चेला सरकार प्राधान्य देईल. सर्व खासदारांचे सरकार ऐकून घेईल. ज्या उणिवा राहिल्या असतील, त्या सुधारून पुढे जाण्याची सरकारची इच्छा आहे. संसदेतल्या पक्षनेत्यांनी आज सायंकाळी जरूर वेळ काढावा. मी त्यांना सगळी माहिती सांगेन. त्याची चर्चा देखील संसदेच्या दोन्ही सदनात करण्याची सरकारची तयारी आहे, असे मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App