वृत्तसंस्था
नवी दिल्ली : High Court महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, केवळ त्या पुरूषाने संबंध संपवले आणि नंतर महिलेने आत्महत्या केली, त्यामुळे पुरूषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही.High Court
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीला निर्दोष मुक्त केले. एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिच्यासोबत तो 9 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता.
न्यायाधीशांनी सांगितले की, तपासात कुठेही असे नमूद केलेले नाही की त्या पुरूषाने मृत महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते. ब्रेकअपनंतरही दोघांमधील संवाद सुरूच होता, असे पुराव्यांवरून दिसून आले आहे. जर त्या पुरूषाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला असता, तर ते महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासारखे ठरणार नाही.
खंडपीठाने म्हटले आहे की, सुसाईड नोट किंवा व्हॉट्सअॅप चॅटवरून असे दिसून येत नाही की त्या पुरूषाने तिला लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यानंतर त्यांचे नाते तुटले. ब्रेकअपनंतर मृताने लगेच आत्महत्या केली नाही.
त्यांनी सांगितले की, जुलै 2020 मध्येच दोघांचे ब्रेकअप झाले होते तर मृताने 3 डिसेंबर 2020 रोजी आत्महत्या केली. याचा अर्थ ब्रेकअप आणि आत्महत्या यांच्यात काहीही संबंध नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App