वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गट आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक यांची राजस्थान मधल्या राजकीय पेचप्रसंगावर परस्पर विसंगत वक्तव्य समोर आली आहेत. अशोक गहलोत यांचा गट कालपासूनच सचिन पायलट यांच्या विरोधात पर्यायाने काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आक्रमक आहे. त्याच वेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक सर्व आमदारांची वन-टू-वन चर्चा करण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षनिरीक्षकांची चर्चा होऊ शकत नाही, अशी भूमिका गहलोत गटाने घेतली आहे. Gehlot group in Rajasthan Congress in trouble
या पार्श्वभूमीवर आज गहलोत गटाचे मंत्री आणि आमदार प्रताप सिंह खाचरियास यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. राजस्थानात लवकरच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट घुसणार आहे. काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल. प्रसंगी आम्ही त्यासाठी रस्त्यावर रक्त देखील सांडू. पण काँग्रेस हाय कमांडणे आमचे म्हणणे तरी निदान ऐकून घेतले पाहिजे, असे वक्तव्य खाचरियास यांनी केले आहे. यातून त्यांनी काँग्रेस हायकमांडला अशोक गहलोत सांगतील तेच नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत हा सूचक पण स्पष्ट इशारा दिला आहे.
मात्र याच पेचप्रसंगावर काँग्रेसचे पक्ष निरीक्षक खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांचे वेगळे वक्तव्य आले आहे. राजस्थानात दोन दिवसात नेमके काय घडले हे आम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्ट सांगितले आहे. काँग्रेस हायकमांड योग्य तो निर्णय घेईल. तो सर्वांना मान्य करावा लागेल. पक्षामध्ये शिस्त आवश्यक आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.
कल जो भी कुछ हुआ उससे हमने कांग्रेस अध्यक्ष को अवगत कराया है। अंत में जो भी निर्णय लिया जाएगा, उसका सभी को पालन करना होगा। पार्टी को एकजुट रखना है और पार्टी में अनुशासन रहना चाहिए: जयपुर में मुख्यमंत्री अशोक गहलोत से मुलाकात के बाद कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे pic.twitter.com/d5z7WCCkvW — ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2022
कल जो भी कुछ हुआ उससे हमने कांग्रेस अध्यक्ष को अवगत कराया है। अंत में जो भी निर्णय लिया जाएगा, उसका सभी को पालन करना होगा। पार्टी को एकजुट रखना है और पार्टी में अनुशासन रहना चाहिए: जयपुर में मुख्यमंत्री अशोक गहलोत से मुलाकात के बाद कांग्रेस नेता मल्लिकार्जुन खड़गे pic.twitter.com/d5z7WCCkvW
— ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2022
राजस्थान की सड़कों पर ED, CBI और IT उतरने वाली है। कांग्रेस कार्यकर्ताओं को सड़कों पर उतरकर लड़ना पड़ेगा। भाजपा अगर एजेंसी भेजेगी तो एजेंसी का जवाब देंगे। कांग्रेस की सरकार को बचाने के लिए कांग्रेस का एक-एक कार्यकर्ता और विधायक लड़ेगा: राजस्थान सरकार में मंत्री पी.एस. खचारियावास pic.twitter.com/1Ygwc6PYhL — ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2022
राजस्थान की सड़कों पर ED, CBI और IT उतरने वाली है। कांग्रेस कार्यकर्ताओं को सड़कों पर उतरकर लड़ना पड़ेगा। भाजपा अगर एजेंसी भेजेगी तो एजेंसी का जवाब देंगे। कांग्रेस की सरकार को बचाने के लिए कांग्रेस का एक-एक कार्यकर्ता और विधायक लड़ेगा: राजस्थान सरकार में मंत्री पी.एस. खचारियावास pic.twitter.com/1Ygwc6PYhL
याचा अर्थ काँग्रेस हायकमांडने विशिष्ट निर्णय घेतला की तो राजस्थानमध्ये अशोक गहलोत गट आणि सचिन पायलट गट या दोघांनाही मान्य करावा लागेल असा आहे. पण अशोक गहलोत गट सध्या याबाबतीत कोणाचे ऐकण्याच्या राजकीय मूडमध्ये दिसत नाही. गहलोत गटाचे 80 पेक्षा अधिक आमदार राजीनामा देण्याचा इशारा देऊन बसले आहेत. अशावेळी गहलोत गट आणि काँग्रेस पक्ष निरीक्षक यांच्यातील परस्पर विसंगत वक्तव्यांमुळे पेचप्रसंगात अधिक भर पडल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App