वृत्तसंस्था
काठमांडू : नेपाळमध्ये ( Nepal ) सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे 60 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी 34 मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत.
226 घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी 3000 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे. मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये 44 ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत.
पाळमधील अनेक भाग शुक्रवारपासून पावसाने जलमय झाले आहेत, त्यामुळे आपत्ती अधिकाऱ्यांनी अचानक पूर येण्याचा इशारा दिला आहे. या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
नेपाळच्या पायथ्याशी आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकांना नद्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नेपाळमधील पावसामुळे कोसी नदी 56 वर्षांनंतर विक्रम मोडणार आहे. शनिवारी नेपाळमधूनही 5 लाख 93 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गंडक बॅरेजमधील पाणी पाच लाख क्युसेकवर पोहोचणार आहे. गंडकच्या आसपासच्या जिल्ह्यांतील सखल भागातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बगहा, बेतिया, गोपालगंज, छपरा आदी जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. बिहारचे दु:ख म्हणून ओळखली जाणारी कोसी नदी तिबेटमधून उगम पावते आणि चीन आणि नेपाळमार्गे भारतात पोहोचते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App