वृत्तसंस्था
नवी दिल्ली : त्रिपुरात जे घडल नाही त्यावरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही बंदला हिंसक वळण लागलं आहे.अशातच आता अशी कोणतीही घटना घडली नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.FACT REVELED: Nothing happened in Tripura! ‘That’ news on social media is wrong; Violence worries Maharashtra; Explanation of Union Home Ministry
News circulating in social media about the damage and vandalization of a mosque in Gomati district of Tripura is fake and is a complete misrepresentation of facts. People should maintain calm and should not be misguided by such reports: Ministry of Home Affairs pic.twitter.com/7NwYc77vAV — ANI (@ANI) November 13, 2021
News circulating in social media about the damage and vandalization of a mosque in Gomati district of Tripura is fake and is a complete misrepresentation of facts. People should maintain calm and should not be misguided by such reports: Ministry of Home Affairs pic.twitter.com/7NwYc77vAV
— ANI (@ANI) November 13, 2021
काय म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयाने?
त्रिपुरा या ठिकाणी मशिद बांधकामाला कोणतंही नुकसान पोहचलेलं नाही. असा कोणताही प्रकार त्रिपुरात घडलेला नाही. लोकांनी शांतता राखावी. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात काकराबन परिसरात एक मशीद पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र ही अफवा आहे आणि पूर्णपणे चुकीची माहिती आहे.
दर्गा बाजार परिसरातल्या मशिदीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. गोमती जिल्ह्यात त्रिपुरा पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.महाराष्ट्रात हिंसाचार आणि प्रक्षोभक विधानं सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्रिपुराच्या घटनेवरून महाराष्ट्रातील शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचं काम केलं. हे सगळं चिंताजनक आहे.कुठल्याही परिस्थितीत शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे अशी आग्रही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App