वृत्तसंस्था
हैदराबाद : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी तेलंगणातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या 20 अधिकाऱ्यांमध्ये 4 जिल्हाधिकारी, 3 पोलिस आयुक्त, 10 पोलिस अधीक्षकांचाही समावेश आहे. तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.ECI Transfers of Officers in Telangana; Action due to negligence, no post will be given till completion of elections
ईसीआयने या अधिकाऱ्यांना त्यांची पदे त्वरित सोडण्यास सांगितले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्तालय आणि एसपी कार्यालयातील त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सर्व जबाबदाऱ्या सोपवण्यास सांगितले आहे. 5 डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे निवडणुकीचे काम दिले जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निष्पक्ष निवडणुका अशक्य : ECI
अशा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पक्षपाती वृत्ती बाळगणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आयोगाची कठोर भूमिका असून त्यांच्यावर शून्य सहनशीलता धोरणांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या दौऱ्यात या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App