विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप नेते आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी आम आदमी पार्टी (आप) सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला. तिवारी म्हणाले की, दिल्ली जल बोर्ड हे अरविंद केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्याय बनला आहे आणि केवळ ऑडिटच नव्हे तर न्यायालयीन चौकशीचीही गरज आहे.Delhi Jal Board is an alternative to Kejriwal governments corruption Manoj Tiwari accuses AAP
ते म्हणाले की, दिल्लीत 1350 एमजीडी पिण्याच्या पाण्याची गरज असताना उपलब्धता केवळ 950 एमजीडी आहे. केजरीवाल यांनी जवळपास 9 वर्षांच्या सत्ताकाळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि दिल्ली आजही टँकर माफियांची शिकार आहे हे दुर्दैवी आहे.
मनोज तिवारी म्हणाले की, दिल्लीचे आप सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. भ्रष्टाचार होऊ नये असे कोणतेही काम करत नाही. पण चोर कितीही हुशार असला तरी तो काही पुरावे मागे सोडून जातो. त्यामुळे अनेक गुपिते उघड होतात. ‘आप’ चोरांची फौज झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App