वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ देशात तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. तिसऱ्या लाटेची भीती वाढू लागली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल, असा साथरोग तज्ज्ञांच्या अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासून खबरदारी घेतली पाहिजे.Corona’s third wave reach its peak in October ?; The prediction of the scientist of the team of Kanpur
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. केरळ राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल, असा दावा करण्यात आला आहे.
साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे.
कोरोनावर लसीकरणाची मात्राच प्रभावी
कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणात आणण्याचे महत्वाचे काम कोरोनाविरोधी लसीच्या डोसने केले आहे. केंद्र सरकारने नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठे प्रयत्न करत आहे.
अवाढव्य लसीकरणाचे शिवधनुष्य केंद्र आणि आरोग्य यंत्रणांनी उचलले आहे. ते आणखी पेलून धरण्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेऊन लसीचे डोस घेतले पाहिजेत. लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना अजून पूर्णपणे कमी झालेला नाही. रुग्णसंख्या वाढत आहे.त्यामुळे कोरोना लसीकरण करणे काळाची गरज आहे.
केंद्राने एका दिवसांत २.५ कोटी डोस देऊन जागतिक विक्रम केला आहे. तसेच अनेकदा एक कोटी डोस जनतेला एका दिवसात दिले आहेत. ही जमेची बाबू आहे. तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल ,असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे वेळ न दवडता लसीकरणासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App