विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतरचे operation Sindoor या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 16 विरोधी पक्षांनी केली, पण त्या मागणी पत्रावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सही नाही. पण ही सही का झाली नाही??, तर सुप्रिया सुळे परदेश दौऱ्यावरून परतण्याची काँग्रेसने वाट देखील पाहिली नाही. हे कारण सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातून आज समोर आले.
वास्तविक संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला शरद पवारांचा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, पण तो त्यांनी उघड बोलूनही दाखविला नाही. सुप्रिया सुळे यांनी मात्र, operation sindoor च्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी योग्य नसल्याचे सांगितले. Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या :
भारताच्या व्यापक हिताचा मुद्दा आहे. त्यामुळे देश आधी येतो. त्यानंतर राज्य, पक्ष आणि कुटुंब. देश आधी येतो. आम्ही कुठल्याही दहशतवादी हल्ल्याविरोधात एकजूट आहोत, हाच भारताकडून जगाला संदेश गेला पाहिजे. एका जिवंत लोकशाहीत प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली पाहिजे. पण त्यासाठी योग्य वेळ असली पाहिजे. Supriya Sule
विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मंचावरुन सरकारकडे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. पण पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विशेष सत्राची मागणी करणं योग्य नाही. विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसंबंधी मी परदेशात असताना काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना सांगितलं की, मी बाहेर आहे, त्यामुळे सोबत येऊ शकत नाही. जो पर्यंत सर्व प्रतिनिधीमंडळ परत येत नाही, तो पर्यंत प्रतिक्षा करावी. मी त्यांना म्हटलं की, मी परत आल्यावर निर्णय घेऊ. पण मी परत येण्याआधीच हे झालं. म्हणून मी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करु शकली नाही.
या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 16 विरोधी पक्षांनी मोदींना पत्र लिहून विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली होती.
शरद पवार गटाची या पत्रावर स्वाक्षरी का नाही?
भारताच्या भूमिकेबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायासोबत चर्चा करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच आम्ही समर्थन केलय असं विरोधी पक्षाने पत्रात म्हटलं होतं. सरकारने दुसरे देश आणि मीडियाला माहिती दिलीय. पण संसदेला माहिती दिलेली नाही. भारतीय जनता आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवलं असं या पत्रात लिहिलेलं. शरद पवार पक्षाची या पत्रावर स्वाक्षरी नाही. या बद्दल सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, हेच कारण आहे. तुम्हाला तथ्य स्थिती समजून घ्यावी लागेल. मी बाहेर होते. शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलेय की हे ऑपरेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमची राष्ट्रवादी काँग्रेस सरकारसोबत उभी राहील. आम्ही सरकारविरुद्ध एक शब्दही बोलणार नाही. ही तुच्छ राजकारणाची वेळ नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App