Pandit Dhirendra Shastri : तिरुपती लाडू वादावर बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

Pandit Dhirendra Shastri

आंध्र प्रदेश सरकारने कठोर कायदा बनवून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील केली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तिरुपती मंदिर प्रसादम वादावर बागेश्वरमचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री  ( Pandit Dhirendra Shastri ) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हे सनातन्यांविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे सांगून भारतातील सनातनी धर्म भ्रष्ट करण्याची पूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. धीरेंद्र शास्त्री यांनी आंध्र प्रदेश सरकारने कठोर कायदा बनवून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, दक्षिण भारतात तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा भाग म्हणून चरबी आणि तुपापासून बनवलेले लाडू वाटण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे. जर ही माहिती खरी असेल तर तो मोठा गुन्हा आहे, निश्चितपणे भारतातील सनातनी विरुद्ध सुनियोजित कट रचला गेला आहे. हा प्रकार करून भारतातील सनातनी धर्म भ्रष्ट करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.



याशिवाय ते पुढे म्हणाले की, तिथल्या सरकारने कठोर कायदे करावेत आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची इच्छा आहे. देवाला अर्पण करताना जर चरबी किंवा माशाच्या तेलाचा वापर केला जात असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव सध्या भारतात असू शकत नाही.

या प्रकरणाची बारकाईने चौकशी झाली पाहिजे आणि मी सरकारला हिंदू मंदिरे लवकरात लवकर हिंदू मंडळाच्या अखत्यारीत टाकण्यास सांगेन. जेणेकरून कोणत्याही सनातनीच्या श्रद्धेला धक्का पोहोचू नये, हे ऐकून मला खूप वाईट वाटले. सनातन्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांची सखोल चौकशी करावी असे मला वाटते. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी संघटित होऊन आतापासूनच मंदिरे सनातनी लोकांच्या ताब्यात आणावीत, अन्यथा अशा परिस्थिती निर्माण होत राहतील., अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Big statement by Pandit Dhirendra Shastri of Bageshwar Dham on Tirupati Ladu controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात