पाकिस्तानने किती राफेल पाडली??, विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS ने सांगितले भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच क्षेत्रांत प्रबळ!!

General Anil Chauhan

नाशिक : पाकिस्तानने किती राफेल विमाने पाडली??, हे विचारायवर काँग्रेसी मोजणी कारकुनांचा भर; पण CDS नी सांगितले, भारत पाकिस्तान पेक्षा सगळ्यांचं क्षेत्रांत प्रबळ!! हे कालच्या दिवसातल्या सगळ्या बातम्यांचे सार राहिले. General Anil Chauhan

CDS अर्थात चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानने भारताच्या विमानांचे नुकसान केले, पण आम्ही आमच्या चुका सुधारून पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करायची ती केलीच, असे स्पष्ट केले. सिंगापूर मध्ये शांग्रीला डायलॉग दरम्यान एका परदेशी चॅनेलसाठी मुलाखत घेताना मुलाखतकर्तीने जनरल अनिल चौहान यांना पाकिस्तानने भारताची सहा विमाने पाडली, तुम्ही कन्फर्म करता का??, असा सवाल केला. त्यावर जनरल अनिल चौहान यांनी ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली, याच्यापेक्षा ती कशी पाडली??, आमच्या नेमक्या काय चुका झाल्या??, हे आम्ही तपासले आणि दोनच दिवसांमध्ये करेक्शन करून अचूक कारवाई केली, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे जनरल अनिल चौहान म्हणाले.

पण जनरल अनिल चौहान यांच्या या एकाच वाक्यावरून काँग्रेसी मोजणी कारकुनांनी गदारोळ माजविला. भारताच्या लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुखच भारताची विमाने पाकिस्तानने पाडल्याचे म्हणतायेत, मग मोदी सरकार देशापासून सत्य माहिती का लपवत आहे??, असा सवाल काँग्रेसने केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश आणि पवन खेडा यांच्यासकट अनेक काँग्रेस नेते मोदी सरकारवर तुटून पडले.

पण जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तान संदर्भात नंतर जे काही सांगितले, त्याबद्दल कुठल्याच काँग्रेस प्रवक्त्याने किंवा काँग्रेसी मोजणी कारकुनांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. किंवा आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही लिहिले नाही. त्यांनी फक्त जनरल अनिल चौहान यांच्या वक्तव्याचे अर्धवट व्हिडिओ शेअर केले.

वास्तविक जनरल अनिल चौहान यांनी भारत आणि पाकिस्तान यांची व्यवस्थित तुलना करून सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा वरचष्मा सिद्ध करून दाखविला.

– जनरल अनिल चौहान म्हणाले :

– भारत आणि पाकिस्तान यांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्याच्या क्षणापासून काही वर्षे पाकिस्तान अनेक क्षेत्रांमध्ये भारतापेक्षा आघाडीवर होता. पाकिस्तानची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती आणि राजकीय स्थिती भारतापेक्षा बेहतर होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारताने सर्वच क्षेत्रांमध्ये पाकिस्तानला मागे टाकले. भारताने आर्थिक प्रगती तर केलीच, पण देशातली बहुलता टिकवून मानवी विकास निर्देशांकात मोठी प्रगती केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे स्थान गाठले. भारताने आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकली.

– हे काही एका रात्रीत चमत्कारासारखे झाले नाही, तर गेल्या कित्येक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताची सध्याची प्रगती साकार झाली. याच काळात पाकिस्तानची सगळ्या क्षेत्रात घसरण झाली. तो देश सामाजिक राजकीय आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला. पाकिस्तानला भारताची सर्व दृष्टीने होणारी प्रगती डोळ्यात खुपायला लागली म्हणूनच जिहादच्या नावाखाली पाकिस्तानने दहशतवाद पोसून भारताच्या सातत्याने कुरापती काढल्या. पण हा भारत आता “जुना भारत” राहिला नसून अतिशय आक्रमक धोरण तयार केलेला “नवा भारत” तयार झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सर्व प्रकारचा दहशतवाद आणि वर्चस्व नवा भारत मोडून काढेल.

जनरल चौहान यांचे हे संपूर्ण वक्तव्य विविध माध्यमांमधून प्रसिद्ध झाले. त्यावर अनेकांनी व्हिडिओ करून सोशल मीडिया हँडलवर शेअर केले, पण काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र या सगळ्याकडे सोयीस्कररित्या पूर्ण दुर्लक्ष केले. जनरल अनिल चौहान यांच्या मुलाखतीचे अर्धवट व्हिडिओ शेअर करून फक्त मोदी सरकारला टोचण्यात धन्यता मानली.

At the Shangri-La Dialogue in Singapore, Chief of Defence Staff (CDS) General Anil Chauhan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात