प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंग्याच्या औलादींची पैदास झाली आहे. नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवल्यानंतर कोल्हापुरात औरंग्याच्या औलादींनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्रभर उसळला असताना मुंबईतून आणखी एक औरंग्याची औलाद त्याच्या समर्थनार्थ उतरली आहे. समाजवादी पार्टीचा आमदार अबू अशी मागणी याने औरंग्याचे समर्थन केले आहे. औरंगजेबाचे समर्थन करताना त्याला धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे बिरूद बहाल केले आहे.Abu Azmi came down in support of Aurangya; Say, Aurangzeb was a secular king!!
या ट्विटमध्ये अबू असीम आजमी म्हणतो :
मी औरंगजेब रहमतुल्ला अलैहच्या साथीला आहे. त्याचा इतिहास जाणून घेतला तर तुम्हाला हे लक्षात येईल की औरंगजेब धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने अफगाणिस्तान पासून बर्मापर्यंत आपले राज्य फैलावले. अनेक हिंदू – मुस्लिम राजांनी सत्तेसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. पण आज त्याला धार्मिक रंग दिला जात आहे आणि त्यामध्ये गोदी मीडिया कारणीभूत आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द शरद पवारांनी आपण छत्रपती संभाजी नगर शहराला त्या नावाने संबोधणार नाही, तर औरंगाबाद नावानेच संबोधणार, असे म्हटले आहे.
मैं औरंगज़ेब रहमतुल्लाह अलैह के साथ हूँ, उनका इतिहास देखोगे तो आप को पता चलेगा वो एक सेक्युलर बादशाह थे जिन्होंने अफ़ग़निस्ता से लेकर बर्मा तक भारतवर्ष बनाया था। इतिहास में ऐसे कई उदाहरण है जहाँ हिन्दू और मुस्लिम शासकों ने सत्ता चलाने के अलग फैसले लिए लेकिन आज उन्हें राजनितिक… pic.twitter.com/8nUtqhjQMP — Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 7, 2023
मैं औरंगज़ेब रहमतुल्लाह अलैह के साथ हूँ, उनका इतिहास देखोगे तो आप को पता चलेगा वो एक सेक्युलर बादशाह थे जिन्होंने अफ़ग़निस्ता से लेकर बर्मा तक भारतवर्ष बनाया था। इतिहास में ऐसे कई उदाहरण है जहाँ हिन्दू और मुस्लिम शासकों ने सत्ता चलाने के अलग फैसले लिए लेकिन आज उन्हें राजनितिक… pic.twitter.com/8nUtqhjQMP
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 7, 2023
औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा नागपूरातून इशारा!!
महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. सरकार औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही.
कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
औरंगजेबाचे उदात्तीकरण झाले तर संताप येणे स्वाभाविक आहे.
पण महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये. औरंगजेबाचे उदात्तीकरण सरकार सहन करणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App