‘आमचे जीव आता तुमच्या हातात’, म्यानमारमधून भारतात पळून आलेल्या १५१ सैनिकांचा टाहो!

भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : म्यानमारमधील ‘अरकान’ या सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराचे १५१ जवान आपला जीव वाचवण्यासाठी भारतात पळून आले आहेत. अरकानने तेथील लष्करी छावण्या ताब्यात घेतल्या, त्यानंतर हे सैनिक भारतात पळून आले आणि मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात पोहोचले. त्यांनी आसाम रायफल्सची मदत घेतली. यानंतर त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.151 soldiers who fled from Myanmar to India plead for help



आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी (३० डिसेंबर) ही माहिती दिली. ते म्हणाले की, या सैनिकांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शुक्रवारी (डिसेंबर 29) आराकान आर्मीच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील त्यांच्या तळांवर कब्जा केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर म्यानमार आर्मीचे सैनिक शस्त्रे घेऊन पळून गेले आणि लांगतलाई जिल्ह्यातील तुइसांतलांगमध्ये आसाम रायफल्समध्ये पोहोचले.

अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.

151 soldiers who fled from Myanmar to India plead for help

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात