“मार्चमध्ये सत्तांतर घडेल”, म्हणाले नारायण राणे!!; “मी ऐकलं नाही” म्हणाले फडणवीस!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मार्चपर्यंत सत्तांतर घडेल पण काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतील, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला.Independence will happen in March said Narayan Rane

त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे वेगवेळ्या बैठकींसाठी
दिल्ली मुक्कामी असल्याने या तर्कवितर्कांना मध्ये आणखीनच भर पडली. अटकळींचा बाजार गरम झाला. पण या अटकळींवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, “नारायण राणे नेमके काय म्हणाले हे मी ऐकलं नाही”, अशा मोजक्या शब्दात उत्तर देऊन त्यांनी सत्तांतराचा चर्चेतून आपले अंग काढून घेतले.

भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्यासमवेत मी आणि चंद्रकांत दादा पाटील यांची पाच तास बैठक झाली. यामध्ये फक्त भाजपचा संघटनात्मक विषय होता. बाकी कोणताही आमचा अजेंडा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.


पक्ष चालवायचा म्हणुन पवार हे देशमुखांचे समर्थन करतात, पण त्यांच्यासारख्या नेत्याने हे करणे अपेक्षित नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका


पण त्याचवेळी महाराष्ट्रातल्या इतर बाबींवर फडणवीस यांनी भाष्य केले. विधान परिषद निवडणूक चार मतदारसंघांमध्ये बिनविरोध होणार आहे तर दोन मतदारसंघांमध्ये लढत होते आहे. यामध्ये नागपूरची जागा आहे. भाजपचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवार आहेत, तर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, कि काँग्रेसला नागपुरात चमत्कार घडेल असे वाटत आहे पण असला चमत्कार नागपुरात पडत नसतो. चंद्रशेखर बावनकुळे हे व्यवस्थित मतांनी विधानपरिषदेवर निवडून येतील.

Independence will happen in March said Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात