Digital India : तब्बल ८२ कोटी भारतीयांकडून इंटरनेटचा वापर; १,५७,३८३ ग्रामपंचायतींमध्ये हायस्पीड ब्रॉडबँड

Digital India 82 crore people are using internet, high speed broadband reached in 157383 panchayats

Digital India : सिस्कोच्या ‘व्हिज्युअल नेटवर्किंग इंडेक्स (व्हीएनआय)’ ने 2017 मध्ये एका अहवालात म्हटले होते की, भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2021 पर्यंत 82 कोटींपर्यंत पोहोचू शकते. सिस्कोचा चार वर्षांपूर्वी आलेला हा अहवाल खरा ठरला आहे. सरकारने राज्यसभेत सांगितले आहे की, देशात किमान 820 मिलियन म्हणजेच सुमारे 82 कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत. Digital India 82 crore people are using internet, high speed broadband reached in 157383 panchayats


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सिस्कोच्या ‘व्हिज्युअल नेटवर्किंग इंडेक्स (व्हीएनआय)’ ने 2017 मध्ये एका अहवालात म्हटले होते की, भारतात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2021 पर्यंत 82 कोटींपर्यंत पोहोचू शकते. सिस्कोचा चार वर्षांपूर्वी आलेला हा अहवाल खरा ठरला आहे. सरकारने राज्यसभेत सांगितले आहे की, देशात किमान 820 मिलियन म्हणजेच सुमारे 82 कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. खरं तर, तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी राज्यसभेत विचारले होते की, सरकारने इंटरनेटच्या नवीनतम स्तराचा किंवा अशा कोणत्याही प्रॉक्सीचा अंदाज लावला आहे का? देशातील 1,57,383 ग्रामपंचायतींमध्ये हाय-स्पीड इंटरनेट सुविधा पुरवण्यात आल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले.

केंद्राचे संसदेत उत्तर

डेरेक यांनी असेही विचारले की, “सध्या ग्रामीण आणि शहरी भारतामध्ये डिजिटल विभाजन अस्तित्वात आहे आणि तसे असल्यास हे अंतर कमी करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?”

या प्रश्नाला उत्तर देताना इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, “भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुसार, देशात 31 मार्च 2021 पर्यंत 82.53 कोटी (825.301 मिलियन) इंटरनेट ग्राहक आहेत.” ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भारतात 302 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत, तर शहरी भारतात ही संख्या 502 दशलक्षांहून अधिक आहे.

ते असेही म्हणाले की, सरकारने ग्रामीण भारतामध्ये इंटरनेट प्रवेश वाढवण्यासाठी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि गावांमध्ये भारतनेट प्रकल्प लागू केला आहे. 1 जुलैपर्यंत एकूण 1,57,383 ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेट / ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडल्या गेल्या आहेत. राजीव गांधी यांच्या मते देशात आतापर्यंत 5,25,706 किमी ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले आहे.

2025 पर्यंत भारतात 90 दशलक्ष सक्रिय इंटरनेट वापरकर्ते असतील

IAMAI-CentreCube ने या वर्षी जूनमध्ये दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 45 टक्क्यांनी वाढून 2025 पर्यंत 90 दशलक्ष होईल. गेल्या वर्षी देशात हा आकडा 622 दशलक्ष होता. अहवालात म्हटले आहे की शहरी भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश ग्रामीण भागाच्या दुप्पट असला तरी ग्रामीण भागात वर्षानुवर्षे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या शहरी भागापेक्षा जास्त आहे.

Digital India 82 crore people are using internet, high speed broadband reached in 157383 panchayats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात