सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी, इथपर्यंत आलाय राजकीय प्रवास!!

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी, इथपर्यंत महायुतीचा राजकीय प्रवास झाल्याचे आज समोर आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करून महायुती सरकारने मतदारांचा विश्वास जिंकला होता. त्या योजनेचा संपूर्ण महायुतीला राजकीय फायदा देखील झाला होता.The government has brought a wealth of schemes to the Shiv Sena from its doorstep, this is how far the political journey has come!!

पण आज रत्नागिरी येथील ‘तारांगण’ या प्रकल्पातील ‘भारतरत्न शिल्प’ या सात भारतरत्नांच्या अनोख्या शिल्पांचा अनावरण सोहळा संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या लौकिकात ही शिल्पं अधिकच भर घालतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.



 

पण त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेना पक्षाने सुरू केलेल्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता केंद्राचे देखील उद्घाटन केले. तिथे शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी, असे लिहिले आहे. याचा अर्थ असा की महायुती सरकार आपल्या दारी ते शिवसेना घेऊन आली योजनांची शिदोरी इथपर्यंत राजकीय प्रवास येऊन ठेपला आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे तंत्र शिवसेनेच्या नेत्यांनी बरोबर अंगीकारले आहे.

 

यावेळी उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The government has brought a wealth of schemes to the Shiv Sena from its doorstep, this is how far the political journey has come!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात