बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!, हेच राजकीय चित्र आज महाराष्ट्रातून समोर आले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामती विधानसभेची आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली. पण यापैकी फक्त बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ती बिनविरोध व्हावी म्हणून पवार कुटुंबीयांनी धाय मोकलली.
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मिळविला त्यानंतर त्यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. त्यांना बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करायची विनंती केली. पण सुनेत्रा पवार यांच्या फोन नंतर सुद्धा काँग्रेस बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवायच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सुरूवातीला “बिनविरोध” निवडणुकीची चर्चा झाली. पण जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेचे एक-दोन नाही तर तब्बल पावणेतीनशे मतदार संघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; तर एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!, हे राजकीय चित्र आज समोर आले.
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे रोहित पवारांनी ऑलरेडी मांडलेत, अशी भावना दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करता यावा यासाठी ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेच्या कार्डाचे लोकार्पण आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा शब्द दिला, पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पोचणार का??, असा सवाल आज समोर आलाय.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर SIT ने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा सरंजामदारांचा पक्ष नरेश अरोरा लोकशाही मार्गाने वाढवायला गेले आणि कॉन्ट्रॅक्ट गमावून बसले!!, हेच खरं म्हणजे राजकीय वास्तव समोर आले.
बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या बारा टक्क्यांवर वाताहत झालेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळताही येईना, अशी अवस्था तमिळनाडूच्या राजकारणात येऊन ठेपली.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहिर केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार न देण्याची विनंती केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला 117 वेळेस कॉल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केल्याचा दावा केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी विचारला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांना तातडीने अटक करून त्यांना हे कॉल डिटेल्स कोणी आणि कोणत्या अधिकारात दिले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.
राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाश्चिमात्य संकल्पनेतील पर्यटनापेक्षा भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले.
महा-साधना सप्ताह 2026 हा मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित देशातील सर्वात मोठ्या टेक-लर्निंग आठवड्यापैकी एक असून, शिक्षण, आत्मचिंतन व दैनंदिन शासकीय कामकाजात ज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देतो.
महाराष्ट्र राज्य शासनाने आज प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एकूण २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App