जाणून घ्या, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
मुंबई: Sharad Pawar ऑपरेशन सिंदूरवरील राजकारण थांबता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही. ही एक अतिशय संवेदनशील बाब आहे आणि त्यावर खुली चर्चा शक्य नाही. विरोधकांची अशी मागणी योग्य नाही.Sharad Pawar
यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करताना म्हटले होते, की दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही देश मूक प्रेक्षक राहू शकत नाही आणि आता जगाला संदेश गेला आहे की ‘भारत आक्रमक आहे.’
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सशस्त्र दलांनी रात्री उशीरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा अड्डा यांचा समावेश होता.
माजी केंद्रीय संरक्षण मंत्री पवार यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले की, ‘गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये जे काही घडले त्यामुळे देशातील लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली. अशा परिस्थितीत कोणताही देश मूक प्रेक्षक राहू शकत नाही. या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना सावधगिरीने पावले उचलणे आवश्यक होते. हे सर्व हल्ले पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर करण्यात आले आहेत, ज्यांना पाकिस्तानचा पाठिंबा आहे. तसेच ते त्या दहशतवादी अड्ड्यांवर मोठ्याप्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे देखील ठेवण्यात आलेली होती. असंही पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App