प्रतिनिधी
रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुनश्च हरिओम म्हणून उद्यापासून पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरू करीत आहेत. त्यांच्या अटकेमुळे ही यात्रा दोन दिवस स्थगित करावी लागली होती. Narayan Rane to kikstart his Jan Aashirwad Yatra from ratnagiri on 27 th aug.
त्यांनी आज मुंबईत लीलावती रूग्णालयात जाऊन चेकअप करून घेतले. हे रूटीन चेकअप असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात उद्या असे असेल कार्यक्रमाचे नियोजन • सकाळी १० वाजता रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण • सकाळी १०.१५ वाजता कैलासवासी श्री. शामराव पेजे पुतळ्याला माल्यार्पण • सकाळी १०.२५ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण • सकाळी १०.५० वाजता विजय देसाई फॅक्टरी गोळप येथे आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग काजू उत्पादक प्रतिनिधींशी चर्चा आणि सत्कार • सकाळी ११.३५ वाजता भाजपा कार्यालय येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सत्कार • दुपारी १२,१५ वाजता विविध प्रतिनिधी मंडळांना भेटी • दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक जन्मस्थान भेट • दुपारी १.१० वाजता स्वा. सावरकर पुतळा माल्यार्पण • दुपारी १.१५ ते दुपारी २ वाजेपर्यंत राखीव वेळ • दुपारी २.३० वाजता व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये पत्रकार परिषद • दुपारी ३.१० वाजता कुवारबाव भाजपा कार्यालय येथे सदिच्छा भेट व लाभार्थी नागरिकांची भेट • दुपारी ३.४५ वाजता लांजा येथे कार्यकर्त्यांना भेट व सत्कार • संध्याकाळी ४.२५ वाजता राजापूर येथे कार्यकर्त्यांची भेट आणि सत्कार
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App