प्रतिनिधी
मुंबई – मराठा आरक्षण रद्द करण्याचा सुप्रिम कोर्टाचा निर्णय आल्यावर त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर भाष्य केले आहे. या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा फटका गरीब मराठा वर्गाला बसला आहे. गरीब मराठा वर्गाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याऐवजी तो श्रीमंत मराठा वर्गाबरोबर राहिल्याने त्याला हा फटका बसला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. Maratha Reservation; prakash ambedkar blames both rich and poor marathas for supreme court debacle
आंबेडकर म्हणाले, की सुप्रिम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. गरीब मराठ्यांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही. त्यांच्यापैकी १० टक्के मराठा समाज श्रीमंत आहे आणि उर्वरित मराठा समाज गरीब आहे. परंतु, या निर्णयासाठी मी गरीब मराठ्यांनाही दोषी धरतो. मराठ्यांच्या विरोधात इथला ओबीसी, आदिवासी नाही, अनुसूचित जातीही नाहीत. गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठा आहे. हे अनेकवेळा मी सांगितले आहे. परंतु गरीब मराठा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसत नाही. गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्यांबरोबरच जातो. त्याचा त्याला या निकालातून फटका बसला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App