महाविकास आघाडी सरकार काळात झालेले सर्व आरोपही रद्द केले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या या नवीन निर्णयानंतर निलंबनाच्या कालावधीत परमबीर सिंह हे सेवेवर होते, असं गृहीत धरलं जाणार आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर मोठी खळबळ माजली होती, शिवाय अनिल देशमुखांना तुरुंगातही जावे लागले. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट पत्र पाठवले होते आणि पोलिसांना विविध ठिकाणांहून पैसे गोळा करायला सांगितले जातात, पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिलं जातं, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.
Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh. The state government also quashed the suspension orders issued in December 2021 and said that he was on duty during the period of suspension. pic.twitter.com/7ER4Vj21ZQ — ANI (@ANI) May 12, 2023
Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh. The state government also quashed the suspension orders issued in December 2021 and said that he was on duty during the period of suspension. pic.twitter.com/7ER4Vj21ZQ
— ANI (@ANI) May 12, 2023
याशिवाय दुसऱ्या बाजूला परमबीर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App