विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी राज्यात ३९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आठड्याभरापूर्वीच्या कालावधीतील १५२२ मृत्यूंचा नव्याने समावेश केल्याने राज्यात एकूण १,९१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. In Maharashtra, the number of corona is low but the death rate is high
आज रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे ६१ मृत्यू नोंदवण्यात आले, तर मिरा भाईंदर ३३, कोल्हापूर २५, मुंबई २२ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्युदर १.७७ टक्क्यांवर इतका आहे.
आज नोंद झालेल्या ३९३ मृत्यूंपैकी २३९ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील तर १५४ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा एक लाख तीन हजार ७४८ वर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यात आज दिवसभरात १२,२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची एकूण संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ६० हजार ६९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App