विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गेल्या काही दिवसांपासून छापासत्र सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी हादरले आहेत. या विषयापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी समीर वानखडे यांच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. Due to action of ED on Ajit Pawar ; False allegations against Wankhade by government Ministers
गेल्या १२ दिवसांपासून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक सुरू आहे, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी ठाकरे-पवार सरकारमधील मंत्र्यांवर केला आहे. ते म्हणाले, क्रांती रेडकर आणि तिच्या कुटुंबीयांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. समस्त महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांची माफी देखील मागितली आहे. अजित पवार यांच्या गैरव्य्वहार प्रकरणात आता एडी देखील चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी लातूर , नांदेड येथील शेतकऱ्यांना घेऊन ईडी कार्यालयात पुरावे सादर करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App