Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli : सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर व्यापारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी हरबत रोडवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli, clash between BJP workers and police
वृत्तसंस्था
मुंबई : सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर व्यापारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी हरबत रोडवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यातील पूर संकटावर ‘कायमस्वरूपी उपाय’ शोधण्याची आणि या संदर्भात काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात पोहोचले, जिथे त्यांनी भिलवाडी, अंकलखोप, कसबे-डिग्रज आणि इतर अनेक भागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाने पूर व्यवस्थापनाच्या दिशेने घेतलेल्या पावलांचा आढावा घेतला.
#WATCH | Maharashtra: A clash breaks out between Police & BJP workers in Sangli. Traders & BJP workers tried to stop CM Thackeray's convoy at Harbat Road to make a statement to him following which the clash took place. The CM is visiting the flood-affected areas of Sangli today. pic.twitter.com/nHzZmxtd0R — ANI (@ANI) August 2, 2021
#WATCH | Maharashtra: A clash breaks out between Police & BJP workers in Sangli. Traders & BJP workers tried to stop CM Thackeray's convoy at Harbat Road to make a statement to him following which the clash took place.
The CM is visiting the flood-affected areas of Sangli today. pic.twitter.com/nHzZmxtd0R
— ANI (@ANI) August 2, 2021
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपल्याला दोन आघाड्यांवर काम करायचे आहे. पहिले म्हणजे पूरग्रस्तांना तातडीने मदत देणे आणि यावर काम चालू आहे. प्रशासनाने आधीच कारवाई केली आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. दुसरे म्हणजे, तत्काळ मदत देण्याव्यतिरिक्त आम्हाला या प्रदेशातील सततच्या पूर संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागेल आणि त्यासाठी आम्हाला काही कठोर उपाययोजना कराव्या लागतील.
ते म्हणाले की, जर काही बांधकामे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आणत असतील तर ती दूर करणे आवश्यक आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे बाधित झालेल्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि त्यासाठी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
Attempts to stop CM Uddhav Thackeray convoy in Sangli, clash between BJP workers and police
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App