अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सोशल मीडिया वरून शंका आणि सवाल यांचे काहूर उठले असताना काही तज्ञ मंडळींनी काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस बजावली आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर त्यांनी उत्तर मागितले आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाने बुधवारी (११ जून) X वर पोस्ट केले आणि UPI व्यवहारांसाठी शुल्क आकारण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार असल्याचे म्हटले.
अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.
गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटने टेकऑफ घेतल्यानंतर हा अपघात झाला.
नवी दिल्ली व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आ
पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाची मे २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रार आणि त्याच्या टोळीवर ही हत्या केल्याचा आरोप होता. मूसेवाला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ कारमधून जात होता आणि त्याचवेळी त्याच्या कारवर १०० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्याला ३ वर्षे उलटल्यानंतर आता गोल्डी ब्रारने हल्ल्यामागील गुपित उघड केले आणि सांगितले की त्याने मूसेवालाची हत्या का केली?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात २०२७ची राजकीय वीण विणण्यास सुरुवात झाली आहे. भाजप सत्तेची हॅटट्रिक करून इतिहास घडवू इच्छित आहे
गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला.
बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली.
भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसाठी नवीन नियम आणले आहेत. आता प्रवाशांना त्यांची सीट कन्फर्म आहे की नाही हे ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी कळेल.
आता तत्काळ तिकिटांसाठी आधार आवश्यक असेल. आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाइटवर आधार पडताळणी करावी लागेल. हा नियम १ जुलैपासून लागू होईल. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, पहिल्या ३० मिनिटांसाठी फक्त आधार प्रमाणित वापरकर्तेच तात्काळ तिकिटे बुक करू शकतील. या काळात एजंट तिकिटे बुक करू शकणार नाहीत.
गेल्या काही वर्षांत भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५°C पेक्षा जास्त जात आहे. त्यामुळे लोक जास्तीत जास्त एअर कंडिशनर (AC) वापरत आहेत. पण हे AC चालवण्यासाठी खूप वीज लागते. त्यामुळे विजेचा खर्चही वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. यामुळेच सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जागतिक दहशतवादाशी लढायची अमेरिकेची तोंडी भाषा; प्रत्यक्षात जिहादी जनरलला army day मध्ये पायघड्या!! असला प्रकार अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने केलाय.
कर्नाटक वाल्मिकी घोटाळ्याची चौकशी करताना ईडीने बेल्लारी येथील काँग्रेस खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी फ्रँचायझी खरेदी करण्याच्या अफवांबद्दल आणि जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्टे केली आहे. ते म्हणाले की आम्हाला लोकांच्या भावना माहीत आहेत आणि आम्ही त्यांच्या जीवनाचा आदर करतो. त्यांनी विचारले की मला आरसीबीची कशासाठी गरज आहे?
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ४ जून रोजी त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले. तसेच, सोमवारी त्यांना DGMO तसेच उप-प्रमुख लष्कर प्रमुख (रणनीती) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.
ईदच्या उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्या जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की राज्यातील हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताविराेधातच संघर्ष करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बांग्ला देशाच्या लष्करप्रमुखांनीच हा डाव उधळून लावला. सरकारवरील नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी हा डाव उधळून लावला.
नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे.
Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App