स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचा वाद वाढत चालला आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंडियाज गॉट लेटेंटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून दाखवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुरावर चर्चा झाली.
संसदेत सादर केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालात असे दिसून आले आहे की देशातील राष्ट्रीय महत्त्वाची सुमारे 280 स्मारके वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील बहुतेक स्मारके राजधानी दिल्लीत आहेत.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार जाऊन नवे भाजपचे सरकार येण्यापूर्वीच केजरीवाल अडचणीत आले त्यांनी बांधलेला शीश महल (CVC) Central vigilance commission अर्थात केंद्रीय दक्षता समितीच्या चौकशीत अडकला.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये दोन उड्डाणपुलांचे उद्घाटन केले. पहिला- मुन्शी पुलिया. दुसरा- खुर्रम नगर उड्डाणपूल. उड्डाणपुलांमुळे १५ लाख लोकांना वाहतूक कोंडीतून आराम मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (14 फेब्रुवारी) माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अटकेवरील स्थगिती 17 मार्चपर्यंत वाढवली. 15 जानेवारी रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर, मैतेई समुदाय त्याविरुद्ध निषेध करत आहे. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर एखाद्या सक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवायला हवे होते, असे समुदायाचे म्हणणे आहे. तर कुकी समुदाय केंद्र सरकारच्या या पावलाला आशेचा किरण म्हणत आहे.
नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांच्या निवडीसाठी 17 फेब्रुवारी रोजी बैठक होऊ शकते. सीईसी निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांचा समावेश आहे. समितीच्या शिफारशीच्या आधारे, राष्ट्रपती पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामधील पाचव्या फेरीची बैठक शुक्रवारी (14 फेब्रुवारी) चंदीगड येथे झाली. या बैठकीला 28 शेतकरी नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्यासाठी राष्ट्रपतींकडे परवानगी मागितली आहे. दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री जैन यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम २१८ अंतर्गत मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.
आज म्हणजेच १४ फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी सोन्याने आपला नवीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ३४१ रुपयांनी वाढून ८६,०८९ रुपये झाली आहे. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव ८५,७४८ रुपयांवर होता. ११ फेब्रुवारी रोजी त्याने ८५,९०३ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला.
जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रशियाच्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून दावा केला आहे की रशियाने त्यांच्या चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला आहे आणि त्यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक होता. असे मत ASSOCHAM आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) या आघाडीच्या उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे.
दोन जणांचा मृत्यू, आठ जण जखमी विशेष प्रतिनिधी इंफाळ : Manipur मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने कॅम्पमध्ये गोळीबार केला, ज्यामध्ये २ जवान मृत्युमुखी पडले आणि ८ […]
दिल्लीतील निवडणूक निकालानंतर आता सर्वांना नव्या सरकारची प्रतीक्षा आहे. अडीच दशकानंतर भाजपने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आहे. तर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल याबाब अद्याप सस्पेन्स आहे, मात्र लवकरच आता नवीन सरकारच्या शपथविधी समारंभ होवू शकतो. यासाठी १९ किंवा २० फेब्रुवारी या दिवसांची चर्चा आहे. तर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान मोदी घरी परतल्यानंतरच घेतला जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विकासकामांवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जाहीर कौतुक केले आहे. गडकरी म्हणाले, उत्तर प्रदेशला भारतातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या संकल्पाने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर सतत भर देत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आता देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक बनले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS), २०२३ च्या कलम २१८ अंतर्गत जैन यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.
आंतरराष्ट्रीय जगतात भारताची ओळख आता संरक्षण क्षेत्रातला निर्यातदार अशी होत असताना फ्रान्स सारख्या विकसित राष्ट्राने भारताकडून संरक्षण सामग्री आयात करण्यात रस दाखविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस मध्ये भेट घेतली. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन केले.
युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाशी संबंधित सर्व प्रकरणांवर एकत्रित सुनावणीची अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रक्रियेनुसार होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. रणवीर इलाहाबादियाविरुद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुरुवारी मणिपूरमधील एका छावणीत एका सीआरपीएफ जवानाने आपल्या दोन सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले. या सर्वांना इम्फाळ येथील रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर आरोप केला की गोगोई यांच्या पत्नीचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत. भाटिया म्हणाले- राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की त्यांची लढाई भारतीय राज्याशी आहे. आता गोगोई यांच्या पत्नीचे पाकिस्तानच्या आयएसआयशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाजीपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी महाकुंभमेळ्याबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी शादियााबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष देवप्रकाश सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.
पुलवामामध्ये सहा वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक सैनिक शहीद झाले होते. यानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अमित शाह म्हणाले की, मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण घेऊन पुढे जात आहे आणि आम्ही दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची उत्तम निगोशिएटर म्हणून स्तुती केली. त्यांना “मिस्टर प्राईम मिनिस्टर, युआर ग्रेट”, असे लिहून मोठे फोटो बूक भेट दिले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App