आपला महाराष्ट्र

Akshay Kumar

Akshay Kumar : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका; नेमकं काय आहे प्रकरण?

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलेलबी ३’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. मात्र रिलीज पूर्वीच हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.

NCW : महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचा मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद; सर्व राज्यांच्या महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन

महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोगाचा महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray बेस्ट साेसायटी निवडणुकीत दारुण पराभवानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, उत्तर देताना संजय राऊतांच्या नाकीनऊ

ठाकरे बंधू एकत्र येऊनही बेस्ट साेसायटीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने प्रस्तावित शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ठाकरेंनी राजकीयकरण केल्याने जनतेने नाकारले; बेस्ट निवडणूक निकालावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना, विविध विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवर भाष्य करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरे बंधूंनी या निवडणुकीचे राजकीयकरण केले, त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. तसेच संजय शिरसाट सिडको अध्यक्ष असताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Police

Maharashtra Police : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: महाराष्ट्र पोलिस दलात 15,631 पदांची मेगा भरती; शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Govt

Maharashtra Govt : पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मर्यादा; डीपीडीसीच्या निधी वाटपातील मनमानीला चाप, राज्य सरकारचे नवे धोरण मंजूर

महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना, सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती. कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांच्या हातात होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

Mahadev Jankar

Mahadev Jankar : शरद पवारांच्या समर्थनार्थ आले महादेव जानकर, म्हणाले- ओबीसी हिताचा निर्णय त्यांनीच घेतला

महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक नेते शरद पवारांना लक्ष्य करतात. त्यात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात. परंतु, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.

Thackeray brothers

Thackeray brothers : एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना ‘बॅलेट पेपर’वरही भाेपळा, बेस्ट साेसायटीत दारुण पराभव

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.

बेस्ट पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर शशांक राव + प्रसाद लाड यांना नेमले भाजपने स्टार प्रचारक; मुंबईत आशिष शेलारांनी तयार केले political buffer!!

मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले

Narendra Dabholkar

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला १२ वर्ष ; मास्टरमाइंड मात्र अजूनही सापडेना

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat : देशाच्या निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा पक्ष काढावा; बाळासाहेब थोरात यांचा निवडणूक आयोगाला टोला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.

Ekta Nagar

Ekta Nagar : एकता नगर परिसरात पुरजन्य परिस्थिति ; स्थानिक नागरिक संतप्त

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे पुण्यातील बऱ्याच भागात पाणी साचलेले आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरील एकता नगर भागाला बसला आहे.

0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!

0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.

माळेगाव ते बेस्ट; पवार + ठाकरे ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन!!

माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!

Fadnavis

Fadnavis : राहुल गांधी ‘सिरियल लायर’ त्यांच्याकडून माफीची अपेक्षाच नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका; लोकनीती-CSDSच्या माफीने वातावरण तापले

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Rathod

Sanjay Rathod : मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार; कर्जमाफीवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू, मंत्री संजय राठोड यांची माहिती

राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी ते यवतमाळमधील पुसद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

Supreme Court

Supreme Court : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीची याचिका फेटाळली; हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टातूनही विरोधकांना दणका

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप करत संपूर्ण विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मात्र, विरोधी पक्षाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही तक्रार महाराष्ट्र उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी योग्य मानली नाही. जूनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, जे सोमवारी फेटाळण्यात आले आहे.

Achyut Potdar

Achyut Potdar : ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हिंदी चित्रपटांत गाजवल्या भूमिका

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation : ‘पीएमआरडीए’ची आघाडी; पुणे महापालिका अजून झोपेतच !

मागील कित्येक दिवसांपासून रखडलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुल अखेर आता नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. मात्र सिंहगड उड्डाणपुलाबाबत पालिकेकडून अजूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. 

Pune Bus Fire

Pune Bus Fire : पुण्यात मुंबई-बंगळुरू मार्गावर बसला भीषण आग; 30 वर प्रवासी बचावले; सर्व वेळीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला

पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नांदेडसह मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ५ ठार, हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर अशी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे.

Sanjay Shirsat

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात; तब्बल 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

महाराष्ट्रातील मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाटांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, सिडकोचे अध्यक्षपद मिळताच संजय शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला तब्बल ५ हजार कोटींची किंमत असलेली १५ एकर जमीन दिली.

Shivaji Sawant

Shivaji Sawant : शिवाजी सावंतांचा भाजपा प्रवेश निश्चित !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि पक्षप्रवेश होत आहेत. अशातच सोलापूरात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे.

Girish Mahajan

Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजनांचा दावा; छगन भुजबळ म्हणाले – सात आमदार असताना आम्ही का मागे राहू?

महायुतीमध्ये सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात थेट “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार,” असे ठामपणे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर गिरीश महाजन यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. दोघांच्या विधानामुळे महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

Ram Shinde

Ram Shinde : अजित पवार ‘ते’ वक्तव्य करून मला टॉर्चर करत आहेत; विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात