शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युती निश्चित झाल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्याकडून मिळत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Maratha reservations : मनोज जरणगे यांच्या मुंबईतील मैदानावरील उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणारा जीआर काढला […]
मुंबई : Elphinstone Bridge : मुंबईच्या व्यस्त मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) वरील वाहतूक काल मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात […]
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हे सशस्त्र दलांसाठी एक रिॲलिटी चेक ठरले आहे. यातून असे दिसून आले की, भविष्यात आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये आपली ताकद आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसे झाल्याचा दावा केला. मी अशिक्षित आहे. पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जीआरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही. यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झालेत झालेत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही बीसीसीआय पैशासाठी हा सामना खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीसीसीआयची ही भूमिका देशाच्या आणि सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करणारी असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘अमानुष’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यात ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार असून, छत्रपती संभाजीनगरची जागा सर्वसाधारण गटासाठी सुटली आहे. सरकारने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सभापतींचे आरक्षणही जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता निर्माणि झाली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? आमच्या लेकराबाळांनी शिक्षण व नोकऱ्या करायच्या नाही का? असे उद्विग्न प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केले. आरक्षणाच्या लढ्यात अगोदर आम्ही संपू, त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण आता कुणीही आत्महत्या करू नका, असेही ते यावेळी ओबीसी तरुणांना उद्देशून म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली राजकीय अपरिहार्यता आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांना निर्माण झालेला राजकीय अस्तित्वाचा धोका या संमिश्र राजकीय वातावरणाचा परिणाम म्हणून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मध्ये पुन्हा एकदा बेबनावाची काडी घालणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे,यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थींना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा त्यांनी घेतला.
सरकारकडे योजनांसाठी देण्यास देखील पैसे नाही. लाडकी बहिण योजनेतही पहिल्याच टप्प्यात 26 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे
मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या जीआर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच बरोबर आमचे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या जीआरला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी आधी जीआर समजून घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.
मुंबई : Reservation for the post of Zilla Parishad President : आता राज्यात बहुप्रतिक्षित अशा जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज […]
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून बोलताना अनेकवेळा नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल, असे विधान केले होते. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील असे विधान केले आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.
ठाकरे बंधूंच्या मिलनामध्ये शिवसेना + मनसेचे सैनिक मग्न; राजकीय कोमात ढकलले पवार आणि राहुल गांधींचे पक्ष!! अशी राजकीय अवस्था आज नाशिक मधल्या शिवसेना आणि मनसे यांच्या मोर्चातून दिसून आली.
मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणावर भाष्य करत टीका केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला आहे, जो आपल्या स्वार्थासाठी इतरांना वेगळे आमिष दाखवून कामाला लावतो, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.
डिजिटलाइझ पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवर सेवा मिळणार असून, त्यात 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटलाइझ पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते आता हळू हळू बाहेर पडत आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की सरसकट आरक्षण दिलेले नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर राज्यात अराजकता निर्माण होईल, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मला असे वाटते आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन ओएएम यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे ‘आयएबीसीए ग्लोबल लीडर्स फोरम 2025’ अंतर्गत ‘महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री राऊंड टेबल’ कॉन्फरन्स झाली.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट नुसार शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले. यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करत आज त्याची बैठक देखील पार पडली. ही बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मंत्री छगन भुजबळ हे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली. छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते. आता ते सरकारलाच घातक ठरत असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका, असे ते म्हणालेत.
ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या जीआरवर आपला संताप व्यक्त केला. सरकारने कुणबी नोंदी संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार आहे. विशेषतः मागील 20 वर्षांत ओबीसी समाजाला फार कमी निधी मिळाला. पण त्या तुलनेत मागील 2-3 वर्षांतच मराठा समाजाला त्याहून कितीतरी जास्त निधी मिळाला, असे ते म्हणालेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App