मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
राजीव गांधींच्या 21व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!
उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला. त्यापाठोपाठ गुजरात सरकारने देखील त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली. त्या संदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त चौंडी (जि.अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५.०० यावेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली.
महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठी भाषेचे काटेकोर पालन करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. जर कोणी राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी गेला तर त्याला फक्त मराठी भाषेत बोलावे लागेल.
गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव करण्याची अप्रतिम संधी लवकरच नाशिककरांना मिळणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिकमध्ये गुरुवारी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
देशातील 5 राज्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची संख्या 149 झाली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे.
पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला राज ठाकरेंनी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांना गळ घातली होती
मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका.
गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेली गोदावरी संवर्धन परिषद नाशिक मध्ये यशस्वी पार पडली. यावेळी गोदावरी खोरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोदावरी आणि पर्यावरणवादी यांनी गोदावरी नदीच्या समस्या मांडून त्यावर मंथन केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
तुमची भावकी टक्केवारी घेऊन पैसे खाते, अशी तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी, राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने शुक्रवारी सूचना जारी केल्या. राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारी करणाऱ्या प्रत्येक खलाशासाठी विभागाने क्यूआर कोड असलेले आधार कार्ड बाळगणे अनिवार्य केले आहे.
देशाच्या विविध भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, महाराष्ट्रातील मालेगावमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवणाऱ्या एका तहसीलदार आणि एका नायब तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने रचलेल्या कथित कटाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. स्वत:च्या घरात झालेल्या पराभवाचा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांसारखे पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर गुरुवारी, 30 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१९च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांनी या संवादात केली. त्यांनी भाजपच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका तपशिलासह सांगितल्या
उद्धव ठाकरे आणि भाजप यांची परस्पर घडवली युती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली माध्यमांचीच पिसे!!, असे आज घडले.
सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ३० जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला जाईल. या नवीन व्यवस्थेनुसार, मंदिरात स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच धनंजय मुंडे + वाल्मीक कराड + संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना “नैतिकता” शिकवली. आज अजितदादांनी बीडमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली. पण खरंतर आधी पोसली राष्ट्रवादीतली खलप्रवृत्ती, नंतर केली चारित्र्य टिकवण्याची दमबाजी असेच या गोष्टीचे स्वरूप राहिले.
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या ६ आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी म्हटले आहे.
सातत्याने हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी,
धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले, असा दावा सुरेश धस यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा अरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App