काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.
बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका फुटण्याला सुचली पश्चात बुद्धी!!, असंच म्हणायची वेळ पवार काका – पुतण्यांच्या प्रतिक्रियांवरून आली.
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.
जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने विक्रमी बहुमत मिळविले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.
जसे तुम्ही पाहिले तसे आम्ही पाहिले आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न दिल्यास संबंधित पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.
पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत बरेच खुलासे केलेत. सोबतच या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी दमानिया यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीने 16 पैकी 12 जागा जिंकून बाजी मारली. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी त्या विषयाचे वर्णन पवार – शेलार युतीचा बंपर फायदा, अशा शब्दांनी केले त्यामुळेच पवार – शेलार युतीचा बंपर फायदा; पण पवार अजून किती “खाली” उतरणार??, असा सवाल समोर आला.
\राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; नुसते फोटो शेअर करून काय होणार??, असा असावा विचारण्याची वेळ शरद पवारांनी शेअर केलेल्या फोटो मुळे आली, पण त्या पलीकडे जाऊन पवारांना असले फोटो शेअर करावेसे वाटतात किंबहुना शेअर करावे लागतात, यातूनच सगळे राजकीय रहस्य बाहेर आले!!, असे म्हणायची वेळ ही आली.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.
मूळ शिवसेना हे नाव कोणाला आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला या विषयाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली
काका – पुतण्याची आतून किंवा बाहेरून युती; पण दोन्ही बुडत्यांना वाचविणार का ऐक्याची काडी??, असा सवाल पवार काका – पुतण्यांच्या राजकीय हालचालीवरून समोर येऊन राहिलाय.
पार्थ पवारच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या जमिनीचा व्यवहार अजित पवार यांना खरंच रद्द करायचाय की नाही??, याविषयी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त होतोय.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या पार्थ पवाराच्या जमीन घोटाळ्यात त्याच्यावरचे बालंट टाळण्यासाठी नेमक्या कुणी आणि कशा “गेमा” केल्या
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App