मुळशी तालुक्यात असलेल्या स्काय आय मानस लेक सिटीमध्ये पाकिस्तानी चलन सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही सोसायटी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) च्या कॅम्पसपासून काही मीटर अंतरावर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील या यशामागे अमित शहा यांचे कष्ट आणि निवडणूक व्यवस्थापनाचेही मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी या निवडणुकीतून आम्हाला खूप शिकायला मिळाले, असेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या दौऱ्यात पुरोहित संघाने गोदावरी आरती पुन्हा ओढली वादात, इतकेच नाही तर राज्यपालांच्या भाषणात आणि त्यानंतर राष्ट्रगीतामध्ये देखील पुरोहित संघाने आपल्या आरतीचा आवाज वाढवून अडथळा आणला. हा सगळा प्रकार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नाशिक दौऱ्यात घडला.
विशेष प्रतिनिधी नाशिक : देशातील नद्या या अध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्र आहेत. त्यांना प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक […]
लवकर दिल्लीतील विभानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत होईल, हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी आधीच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली
शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवरजबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोधअसेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंटबदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांनाविकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धीमहामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता.
आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून आमच्याकडे येत असतात. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योगांना त्रास देणारा महायुतीचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असूद्यात, त्याला सोडू नका. त्यांच्यावर थेट मकोका लावा. या लोकांवर मकोकाच्या खालची कारवाईच करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना दिली.
समस्त नाशिककरांसाठी एक अनोखा सन्मान सोहळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये रंगला.
औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (एनए) परवानगी आवश्यक असणार नाही. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शून्यातून समाजसेवेचा आणि स्त्री सेवेचा भव्य दिव्य असा संसार थाटणाऱ्या माहेरवाशीण सौ. विजयाताई रहाटकर यांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत असतानाच दिल्ली येथे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत भव्य जनजाती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!
काही दिवसांत त्यांचे लग्न होणार होते. विशेष प्रतिनिधी पुणे : Shirish More महाराष्ट्रातील पुणे येथील तीर्थक्षेत्र देहू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत आज आष्टी मध्ये अवतरली होती बॉलीवूड मधली, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे. या सगळ्यांची जुगलबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेत उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीवर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
तत्कालीन शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
राजीव गांधींच्या 21व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App