महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार ना कुठल्या वाटाघाटींमध्ये भाग घेत आहेत, ना त्यांनी कुठल्या सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. पण उद्या बारामतीत होणाऱ्या गौतम अदानींच्या कार्यक्रमाला मात्र पवार हजर राहणार आहेत. पवारांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये एकूण हालचालींवरूनच आता उरले अदानींपुरते असे म्हणायची वेळ आली आहे.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
पवार काका – पुतण्यांची युती फिसकटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकण्याची तयारी!!, हे राजकीय चित्र पुण्यातून समोर आले. जपने अजितदादांना महायुतीतून दूर सारल्यामुळे त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणे भाग पडले, पण अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी सोडून द्या आणि घड्याळ हाती घ्या घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवा, असा आग्रह धरल्यामुळे पुण्यातली काका – पुतण्यांची युती फिस्कटली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या दादागिरीला जुमानले नाही.
भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही निशाणा साधला. सध्या केवळ खुर्ची, स्वार्थ, सत्ता व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी होत आहेत. काही नवीन लोकं युती करत आहेत. त्यांनी पूर्वीच त्यांचा अनुभव घेतला आहे. पण आता ते पुन्हा त्याचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेत, असे ते राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणताना म्हणालेत.
राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांमुळे आधीच वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत, सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुलचालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून संबंधित नेत्यांचा विचार, दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले.
भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू ठामपणे एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षांच्या वाट्यात खोडा घालायचा डाव पवार काका – पुतण्यांनी खेळलाय.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार, याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या असताना बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम; भाजपच्या सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!, हेच राजकीय वास्तव समोर आलेय.
मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!, असे राजकीय चित्र एका निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे बंधू काही वेगळा निर्णय घेतात का??, असा सवाल देखील पुढे आला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेना भाजप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे यांनी छोट्या पक्षांशी देखील वाटाघाटी सुरू ठेवल्यात.
महापालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कुठल्याही पक्षाशी युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये. अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे?? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात. युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केले.
भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिक फार मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना आणि मनसेच्या दोन माजी महापौरांनी काल मोठा जल्लोष केला.
आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीची अधिकृत घोषणा केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप वर्षांनी दोघे भाऊ एकत्र आले आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदेंनी उपस्थित केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App