आपला महाराष्ट्र

Shaniwarwada

“त्यांना” हाजी अलीवर महाआरती आणि हनुमान चालीसा पठण केले तरी चालेल का??; शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून नितेश राणेंचा संताप

पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले. त्या नमाज पठणाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.

Eknath Shinde

एकनाथ शिंदेंची ठाण्यात सर्वपक्षीय दिवाळी; भाजप + मनसेच्या मंचांवर हजेरी!!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्थानिक भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा करीत असले

Raj Thackeray

Raj Thackeray : महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार भरले; निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालंय; मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.

Pune Shaniwarwada

Pune Shaniwarwada : पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक, गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण

पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतितपावन संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे असलेली मजार काढण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आला आहे.

Mahadev Jankar

Mahadev Jankar : मतचोरीचा मला अनुभव, राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत, विरोधकांचा आरोप योग्यच; महादेव जानकरांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज बुलढाणा येथे बोलताना ‘देशात मतचोरी होत आहे’ या विरोधकांच्या आरोपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शनिवार वाड्यात नमाज पठण, मोठ्या आंदोलनानंतर पोलिसांना जाग, अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल; पण काँग्रेस + राष्ट्रवादीला नमाजींचा कळवळा!!

ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांन तिथे मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना जाग आली पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास काम चालविले

Empowerment

दिव्यांगांचे सशक्तीकरण; दीपावली उजळली,आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता ई – रिक्षा वाटप करण्यात आले.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.

Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar : राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र भूमिकेत सातत्य नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लाव रे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, त्यांचा राजकीय भरती-ओहोटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत असल्याची खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Jayant Patil

Jayant Patil : ज्यांना बोगस मतदानाचा फायदा झाला ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, आयोगाने अनेक गोष्टी दडवल्याचा आरोप

राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने याबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख; नागपुरात प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना राबवून नव्या पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली.

Sanjay Raut

Sanjay Raut : मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मुंबई मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Laxman Hake

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना भावनिक पत्र- जरांगे मुखवटा, क्रूर मराठा राजकीय नेत्यांचा हेतू साध्य, स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल?

राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन आदेशामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असून, ओबीसी समाजाची मसलत संपल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Maharashtra

maharashtra: महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर; गृहमंत्रालयाकडून कर्नाटक राज्यालाही 384 कोटींची मदत जाहीर

मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरसंकटाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने १५६६.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत केंद्राची ही दुसऱ्या टप्प्यातील मदत आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांची तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात हा निधी दिलासा देणारा ठरणार आहे.

धाराशिव मधल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिवाळी साजरी!!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दिवाळी साजरी केली. दिवाळी पूर्वसंध्येला आज ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी खास स्वरदीपावली या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Shaniwar Wada

सारसबागेपाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण; पुण्यातले हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन झोपलेय का??

तळ्यातला गणपती सारसबाग इथे नमाज पठणाचा संतप्त प्रकार घडल्यानंतर त्या पलीकडे जाऊन काही जिहाद्यांनी हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण केले. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यासमोर आंदोलन केले शनिवार वाड्यात नमाज पठण होत असताना पोलीस प्रशासन झोपले होते का??, असा परखड सवाल केला.

Raj Thackeray

96 लाख लोक मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचे गौडबंगाल; राज ठाकरेंना महाविकास आघाडीला निवडणुकीवर बहिष्कार घालायच्या दिशेने खेचायचेय काय??

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज एक खळबळजनक आरोप करून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळ्याच दिशेने न्यायचा घाट घातल्याची चुणूक दाखविली. राज ठाकरे यांनी गोरेगाव मध्ये मनसेच्या मेळाव्यात निवडणूक आयोगाने भाजप यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी 96 लाख मतदार हे मतदार याद्यांमध्ये घुसविल्याचा दावा केला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात तब्बल 96 लाख मतदार याद्यांमध्ये घुसविले आहेत. त्याबद्दल तुम्ही सावध राहा. ठिकठिकाणी जाऊन मतदार याद्या तपासा. खोट्या मतदारांना जाळ्यात ओढा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

Girish Mahajan

Girish Mahajan : मराठा आरक्षणाच्या जीआरचा निर्णय सरकारचा; कोणाला टार्गेट करणे योग्य नाही, भुजबळांच्या टीकेनंतर विखेंच्या साथीला गिरीश महाजन

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली. जीआरचा निर्णय हा वैयक्तिक नसून समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही टार्गेट करणे योग्य नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

Pankaja Munde

Pankaja Munde : बीडच्या ओबीसी मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या- भुजबळांनी याआधीही असे मेळावे घेतलेत, त्यांनी त्यांची बाजू मांडली असावी

बीड जिल्ह्यात नुकताच झालेला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा गाजला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी विचारले असता, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी त्यांची भाषणे पाहिली नाहीत, थोड्या वेळाने पाहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच भुजबळ साहेबांनी त्यांची बाजू मांडली असावी, असेही त्या म्हणाल्या.

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : भुजबळांच्या व्हिडिओवर वडेट्टीवारांचा पलटवार; ते ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात- विजय वडेट्टीवार

मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची आपसातच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत. शुक्रवारी बीड येथे झालेल्या ओबीसीच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांचा एक जुना व्हीडीओ दाखवला. त्याला शनिवारी पत्रकार परिषदेतून वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो; ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा सल्ला

बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil,

Radhakrishna Vikhe Patil, : ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? मंत्री विखे पाटील यांचा सवाल; OBC नेत्यांना राईचा पर्वत न करण्याचा सल्ला

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही? असे ते म्हणालेत.

Babbanrao Taywade

Babbanrao Taywade : वडेट्टीवारांनी भूतकाळात चूक केली, पण ती सभेत दाखवणे योग्य नव्हते, तायवाडेंचा भुजबळांना सल्ला

मंत्री छगन भुजबळ हे समाजाचे मोठे नेते आहेत. एका प्रकारे ते वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या ओबीसी नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर आणणे योग्य नाही, भुजबळ यांनी तसे करायला नको होते, असे म्हणत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar : मी शत्रू नव्हतो, तरीही भुजबळांनी मला का टार्गेट केलं?, विजय वडेट्टीवारांचा सवाल, मराठा-ओबीसी वादावरून सरकारवर हल्लाबोल

बीडच्या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मला का टार्गेट केले? मी तर कधीच त्यांचा शत्रू नव्हतो. त्यांचा विरोध केला नाही, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. मला निमंत्रण नव्हते, माझ्या मतदारसंघात काम होते म्हणून मी मोर्चाला जाऊ शकलो नाही म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना सवाल केला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- भुजबळांची विखेंवर टीका हे मुख्यमंत्र्यांना आव्हान; भुजबळांना अजित पवार अन् फडणवीसांनी नव्हे तर मोदींनी मंत्री केले

छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात