मोगल बादशहा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात एएसआयचे संरक्षण मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच प्रत्येकाला असच वाटते की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम नागपूर येथील 2 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी आणि गोल्फ ॲकॅडमी व लर्निंग सेंटरचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde या “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून महाराष्ट्रात वादविवाद झाला. पंकजा गेली ५ – ७ टार्गेट झाल्या. राजकीय आयुष्यात त्यांना चढ-उतार सहन करावे लागले.
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकलेले सगळे नेते “पवार संस्कारित”; पण बारामतीतला निषेध मोर्चा मात्र युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत!!, असे आज घडले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र स्थान असलेल्या सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा सेवाग्राम येथून श्रीगणेशा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. तेव्हापासून या सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ची चर्चा सुरू आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द सुरेश धस यांनी हे मान्य केले होते
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त माता-भगिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच एक्सवर एक पोस्ट शेअर करून आपली भूमिकाही मांडली. राज ठाकरे म्हणाले,
समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. अबू आझमींनी औरंगजेबाची स्तुती केली होती. यानंतर ते वादात सापडले आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. आता त्यांनी सभापतींना पत्र लिहून त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे राज्यातील वीज उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांच्या (PSPs) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली.
स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसातील वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांत वीज दर २४ टक्क्यांनी कमी होतील,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक (सुमारे १.५ कोटी कुटुंबे) हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. त्यांच्यासाठी नवीन योजना आणली जाईल. याद्वारे ते घरावर सोलार पॅनल बसवून पूर्णपणे वीज बिलमुक्त होतील, असे ते म्हणाले.
जेसीबी लावा आणि औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी आज केली. अबू आजमी आणि अन्य लोकप्रतिनिधींनी औरंगजेबाचे महिमामंडन केले
मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या कामाला स्थगिती या माध्यमांच्या लाडक्या बातम्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी विरोधकांना आणि माध्यमांना टोला हाणला.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे.
बांधकाम कंपनी लार्सन अँड टुब्रो (L&T) ने त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवसाची मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी ८ मार्च रोजी महिला दिनापूर्वी हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, 6 मार्च 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे औचित्य साधून ’13 D थिएटर’चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा लघुपट पाहिला व उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे गुरुवारी ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पेस टेक आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे, 6 मार्च 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केल्याच्या विजयोत्सवाचे औचित्य साधून ’13 D थिएटर’चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा लघुपट पाहिला व उपस्थितांना संबोधित केले.
एका अर्धनग्न अवस्थेतील व्यक्तीला एक व्यक्ती बॅटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाण करणारा हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले आहे. या खोक्या उर्फ भोसलेला धस यांचा आशीर्वाद आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि विद्यमान राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या एका वक्तव्याने फडणवीस सरकारची पुरती गोची झाली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारची ठाम भूमिका सांगून सुटका करवून घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास विलंब झाल्याची स्पष्ट कबुली दिली. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी मंत्र्यांच्या जवळचा होता. त्यामुळे मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज होती. पण आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केले आणि त्यांनी राजीनामा दिला, असे ते म्हणालेत. आरोपपत्र दाखल केल्यानंतरच मी देशमुख हत्याकांडाचे फोटो पाहिले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप महायुतीच्या सरकारची गेल्या तीन महिन्यांमधली राजकीय वाटचाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडलेली दिशा भाजप शतप्रतिशत कडे निघाल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची हात जोडून माफी मागत पंकजा मुंडे यांनी सुसंस्कृतपणा दाखवला. परंतु, धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराडचे पीए भेटायला जात होते. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नाही,
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित झाल्यानंतर अबू आझमी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या निलंबनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आझामी म्हणाले की, मी विधानसभेत असे काहीही बोललो नाही, मला तिथून का निलंबित करण्यात आले.
भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप झाला. विरोधकांनी केलेल्या या आरोपांचे गोरे यांनी खंडन केले. 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने निर्दोष मुक्त केलं होतं, ते प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचे ते म्हणाले.
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना या महिन्यापासून म्हणजेच मार्च २०२५ पासून १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. खाजगी रुग्णालयांसाठीही हा नियम अनिवार्य असेल. ही प्रणाली देशभरात लागू केली जाईल. यासाठी NHI नोडल एजन्सी म्हणून काम करेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App