राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परवानगीशिवाय ,महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यात आता आणखी एका नवीन प्रकरणामुळे त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत मराठी मतांची वज्रमूठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर निवडणुका जवळ आल्या की मराठी मराठीचा नारा लावायचा आणि मराठी मते काय आमची नाहीत का? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालकांना एका आठवड्याच्या आत विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली आहे. हा सरकारसाठी एक झटका मानला जात आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे, तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील यशवंतराव सेंटर येथील राज्यव्यापी परिषदेत भाषण करत अनेक विषयांना हात घातला. तसेच जन सुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत सरकारवर टीका केली आहे.
राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र वाहन मालकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुण्यात खासगी वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप पोलीस यंत्रणेकडून सतत केला जातो. परंतु पुणेकरांना खड्डे आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मात्र मिळत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज माटुंगा, मुंबई येथे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 चाळवासीयांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांच्या चावीचे वितरण करण्यात आले.
धनंजय मुंडे यांचा ‘सातपुडा’ बंगला सोडण्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. मुंबईत स्वतःच घर असूनही शासकीय बंगला सोडत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर आता मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील ५५६ पुनर्वसित सदनिकांचे आज (१४ ऑगस्ट) वितरण झाले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबई येथील गिरगांव भागात एक आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलंय. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईत त्यांच्या नावावर अजून ३ ते ४ फ्लॅट असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
काका + पुतण्यांच्या पक्षांचे गुंडगिरीला सारखेच प्रोत्साहन; मारामाऱ्या करणाऱ्यांना दिले प्रमोशन!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडल्याचे समोर आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचे प्रमोशन केले
महाराष्ट्रानंतर तेलंगणात १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी झाल्यानंतर वाद निर्माण झाला. गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका व्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासनाने असे आदेश जारी केले.
धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.
मुंबईतील कबुतरखान्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आरोग्याचे रक्षण झालेच पाहिजे. त्याचसोबत काही आस्थेचे विषय आहेत त्याची पण आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून आपण मार्ग काढू शकतो. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. तसेच हा वादाचा मुद्दा नसून हा समाजाचा प्रश्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.
शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव आणि ब्राम्हण सहाय्यक संघात सध्या वाद सुरू आहे. अत्यंत जातीयवादी भूमिका मांडताना जाधव यांनी पेशव्यांवरही निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पाजळली राजकीय विद्वत्ता; 41 आमदारांचा पक्ष 10 आमदारांच्या पक्षात विलीन करायची केली सूचना!!, असं खरंच घडलं.
पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. तेथील भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यात उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!, असला प्रकारात बारामतीत घडला. हुल गांधींच्या मतांच्या चोरीच्या आरोपांना वेगळे वळण देण्यासाठी शरद पवारांनी दोन लोक आपल्याला भेटल्याची स्टोरी माध्यमांना सांगितली होती, पण त्या संदर्भात निवडणूक आयोग आपल्याकडे पुरावे आणि तक्रारीची मागणी करेल हे लक्षात येताच खुद्द पवारांनी नंतर तो विषय “गुंडाळून” टाकला. महाराष्ट्रातील त्यावरची चर्चा देखील त्यांनी “आपल्या पद्धतीने” थांबवली. परंतु, बारामतीत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी फक्त दोन वाक्यांमध्ये उत्तर देऊन त्यांनी देखील हात वर केले.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र असे असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान अजूनही रिकामं केलेलं नाही.
स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील हजारो तरुण गत अनेक वर्षांपासून या पोलिस भरतीची प्रतिक्षा करत होते. अखेर सरकारने हा निर्णय हातावेगळा करून त्यांची मागणी पूर्ण केली आहे. प्रस्तुत निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत जाळपोळ व दंगल घडवण्याचा कट आहे. त्यामुळेच ते ऐण सनावारांच्या दिवसांत मुंबईला जात आहेत, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी केला. या प्रकरणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगेंना आंतरवाली सराटीतच रोखण्याचे आवाहनही केले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App