“समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ या जागतिक परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून 1 जण ठार व 3 जण जखमी झाल्याची घटना मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातील एलबीएस रोडवर घडली आहे. ऐन वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेस व ठाकरे गटाने या प्रकरणी सरकारवर सडकून टीका करत सरकार व एमएमआरडीए प्रशासनाला मुंबईकरांच्या जीवाचे काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यावर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस भर देत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामध्ये डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आघाडीवर आहेत. त्यांनी म्हणे, “दादांची सावली” नावाची एक थीम तयार केली असून त्या थीम द्वारे अजित पवारांचे सावली म्हणून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित करण्यात येईल.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नसल्याच स्पष्ट केले आहे. रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे का? ही चर्चा आज, उद्या, महिना किंवा 2 महिन्यांनीही करता येईल. या प्रकरणी घाई करण्याची काहीच गरज नाही, असे ते म्हणालेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला होता. आता यावर राहुल नार्वेकरांनी ट्विट करत या प्रकरणी खुलासा केलया आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त विधान करत महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्यासाठी आज कसारा – मनमाड, 131 किलोमीटरच्या ₹10,154 कोटींच्या 3 आणि 4 च्या नव्या मार्गिकांना मंजुरी दिली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज द टाइम्स ग्रुपच्या ‘ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली.
ज्या नरेश अरोरा यांच्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला, त्याच नरेश अरोरा यांच्या बंधूंना सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार भेटले. पुण्यातल्या सर्किट हाऊस मध्ये त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वर्तुळात सुनेत्रा पवार विरुद्ध रोहित पवार यांच्यातले राजकीय द्वैत समोर आले.
उच्च न्यायालयाच्या इमारती, राज्यभरातील न्यायमूर्तींची निवासस्थाने आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या सुरक्षा ऑडिटचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस विभागाला दिले आहेत. १७ फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी हा तपशील द्यावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर महत्त्वाची विधाने केली. अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरे यांनी “प्रस्ताव आल्यास एकत्रित बसून चर्चा करू’ असे संकेत दिले
नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी महापालिका मुख्यालयातील आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारपर्यंत सामोपचाराने हा फोटो काढण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर सेना पदाधिकारी व नगरसेवक परतले.
मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावून माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!, हेच राजकीय वास्तव महापालिकांच्या निवडणुकीनंतर समोर आले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची “चूक” काढताच सुनील तटकरे यांनी गंभीर इशारा दिला. या गंभीर इशार्याचा अर्थ एवढाच की शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणात मोठा खोडा घालून ठेवला.
अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर भावनिक आघात झाला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, शरद पवारांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आल्याचेही त्यांनी नमूद केले.
नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे आरोरांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी चर्चेला गेल्याचा अंदाज असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.
एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.
कुठल्याही पवारांनीच सत्ता भोगायची, पण इतरांवर फोडायचे खापर; दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी ही तर मोठी तडफड!!, हेच राजकीय वास्तव आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या वक्तव्यांमधून समोर आले.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तटकरेंनी ही भूमिका विषद केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दा तूर्त लोंबकळल्याचा दावा केला
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App