उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा; शरद पवार करणार राज्यसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारने एक क्रांतिकारक पाऊल टाकून महिला आरक्षण आणि लोकसभेच्या जागा वाढविण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटले की, निवडणूक आयोग, नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग) आणि वित्त आयोग अशा घटनात्मक संस्थांनी स्वतंत्र व राजकीय प्रभावापासून मुक्त राहणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. त्या शनिवारी चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देत होत्या.
: होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत करार करण्यासाठी इराणकडे फक्त 48 तास आहेत, नाहीतर त्यांना नरकयातना भोगाव्या लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी इराणला दिला आहे.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदुकुश होते. अफगाण-ताजिकिस्तान सीमेवरही 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करता यावा यासाठी ‘RuPay On-The-Go’ एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या योजनेच्या कार्डाचे लोकार्पण आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सोबत केले.
भारताकडे येणारा इराणी कच्च्या तेलाचा टँकर अचानक मार्ग बदलून चीनकडे वळला. हा टँकर सुमारे ७ वर्षांनंतर भारतात पोहोचणारे पहिले इराणी तेल जहाज होते आणि गुजरातच्या वाडिनार बंदराकडे येत होता. यात सुमारे ६ लाख बॅरल कच्चे तेल भरलेले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशातील फेडरल निधीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. याची जबाबदारी उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा शब्द दिला, पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे केवळ शरद पवारांच्या पाठिंब्यावर विधान परिषदेत पोचणार का??, असा सवाल आज समोर आलाय.
अमेरिकेत पॅम बॉन्डी यांना हटवल्यानंतर टॉड ब्लांश यांना कार्यवाहक ॲटर्नी जनरल बनवण्यात आले आहे. त्यांना यापूर्वी डेप्युटी ॲटर्नी जनरल म्हणून काम करण्याचा अनुभव होता आणि आता ते न्याय विभागाची सूत्रे सांभाळत आहेत.
भारतीय नौदलात शुक्रवारी तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन कार्यान्वित करण्यात आली. यापूर्वी INS अरिहंत (2016) आणि INS अरिघात (ऑगस्ट 2024) यांना नौदलात समाविष्ट करण्यात आले आहे. अरिदमनला अनेक महिन्यांच्या चाचण्यांनंतर केरळमधील नौदल तळावर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर SIT ने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा सरंजामदारांचा पक्ष नरेश अरोरा लोकशाही मार्गाने वाढवायला गेले आणि कॉन्ट्रॅक्ट गमावून बसले!!, हेच खरं म्हणजे राजकीय वास्तव समोर आले.
एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर अनेक एअरलाईन्सनी इंधन अधिभार (फ्युएल सरचार्ज) वाढवला आहे. यामुळे प्रवाशांवरील वाढता भार लक्षात घेता केंद्र सरकार आता या प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे.
बारामतीसाठी सुनेत्रा पवारांची फोनाफोनी; सगळी धडपड पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
तमिळ अस्मितेच्या राजकारणात अवघ्या बारा टक्क्यांवर वाताहत झालेल्या दोन राष्ट्रीय पक्षांना आपापल्या नेत्यांना संभाळताही येईना, अशी अवस्था तमिळनाडूच्या राजकारणात येऊन ठेपली.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहिर केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार न देण्याची विनंती केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला 117 वेळेस कॉल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 वेळा कॉल केल्याचा दावा केला आहे. हे कॉल नेमके कशासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी विचारला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांना तातडीने अटक करून त्यांना हे कॉल डिटेल्स कोणी आणि कोणत्या अधिकारात दिले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.
राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ला ‘अभिमत विद्यापीठाचा’ (Deemed University) दर्जा दिला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार शिक्षण मंत्रालयाने 30 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करून याची घोषणा केली.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इराणने एक अमेरिकन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. इराणी वृत्तसंस्था ‘मेहर’नुसार, हे हेलिकॉप्टर एका अमेरिकन वैमानिकाच्या शोधासाठी इराणमध्ये दाखल झाले होते.
अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी पॉलिटिकल कन्सल्टंट कंपनी I-PAC च्या तीन ठिकाणांवर छापे टाकले. ED ची टीम दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये कंपनीच्या कार्यालयांवर कारवाई करत आहे.