विशेष प्रतिनिधी
मुंबई : नसरापूर येथे भीमराव कांबळे या 65 वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला असून हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी होत असताना फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. सरकारने या प्रकरणाचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कडे सोपविला.Nasrapur atrocity case to be investigated by Special Investigation Team; Fadnavis government’s decision
नसरापूर घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली. नसरापूरच्या घटनेनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला. नसरापूरमधील नागरिकांनी शनिवारी पुण्यातील नवले पुल बंद केला होता. त्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी सरकारने हालचालींचा वेग वाढाविला.
– दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश
सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये पुणे ग्रामीण पोलीस विभागातले अधिकारी असून त्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नसरापूरच्या घटनेचा संपूर्ण सखोल तपास करून विशिष्ट वेळेत सरकारकडे अहवाल सादर करण्याची या इन्व्हेस्टिगेशन टीम कडे जबाबदारी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App