विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडताना मोदी सरकारच्या “विकसित भारत 2047” या संकल्पनेवर भर दिला. मोदी सरकारनेच भर दिलेल्या पायाभूत सुविधा निर्मिती आणि नवतंत्रज्ञान उत्पादन या क्षेत्रांवर “फोकस” करणारा अर्थसंकल्प सादर केला. Union Budget 2026
या अर्थसंकल्पातून देशातल्या पायाभूत सुविधांचे नेटवर्क मजबूत करायचा प्रयत्न केला. मोदी सरकारने आर्थिक सुधारणा धोरण सर्वसामान्यांपर्यंत नेले. त्याचा विस्तृत आणि खोलवर परिणाम पुढे होत राहावा, यासाठी तरतुदी केल्या.
भारतीय आयपीचे उत्पादन आणि निर्मिती आणि पुरवठा साखळी तयार करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी ₹40,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ पृथ्वी सामग्रीसाठी समर्पित सुविधा स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी समर्पित खनिज पार्क स्थापन केले जातील, अशीही घोषणा त्यांनी केली. उच्च-परिशुद्धता घटक तयार करण्यासाठी दोन ठिकाणी हाय-टेक टूल रूम स्थापन केले जातील . यामध्ये टनेल बोरिंग मशीनपासून ते बहुमजली अग्निशमन प्रणालीपर्यंत सर्वकाही समाविष्ट असेल, असे त्या म्हणाल्या.
#UnionBudget2026 | Union FM Nirmala Sitharaman says, "I propose to increase the limit for duty-free imports of specified inputs used for processing sea foods for export from the current 1% to 3% of FOB value of the previous year's export turnover. I also propose to allow… pic.twitter.com/qXYP39l5dM — ANI (@ANI) February 1, 2026
#UnionBudget2026 | Union FM Nirmala Sitharaman says, "I propose to increase the limit for duty-free imports of specified inputs used for processing sea foods for export from the current 1% to 3% of FOB value of the previous year's export turnover. I also propose to allow… pic.twitter.com/qXYP39l5dM
— ANI (@ANI) February 1, 2026
निर्मला सीतारामन यांच्या घोषणा
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App