ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. Landslides after heavy rains in Keralas Wayanad 24 killed 70 injured
विशेष प्रतिनिधी
वायनाड : केरळमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 हून अधिक लोक गाडले गेले. ज्यामध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भूस्खलनाचा अंदाज यावरून लावता येतो की, तामिळनाडूहून मदतकार्यासाठी हवाई दल वायनाडमध्ये पोहोचले आहे.
मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पहाटे 4.10 च्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. सध्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून 24 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 70 जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हेही या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेने बचावकार्य सुरू केले. राज्यातील सर्व सरकारी यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. राज्यमंत्री आज घटनास्थळी भेट देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App