दिल्ली सीमेवर कलम 144 लागू, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसही सतर्क झाले आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे. सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांसोबतच निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.Section 144 imposed on Delhi border tight security in the wake of farmers march



यासोबतच दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर कलम 144 लागू केले आहे. यासोबतच सीमेवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांचीही पोलीस तपासणी करत आहेत. यासोबतच तेथील पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. शेतकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी सिमेंटचे बॅरिकेड्स लावून कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. यासोबतच रस्त्यांवर खिळेही टाकण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सिंघू सीमेवर व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी सिंघू सीमा पूर्णपणे सील करण्यात येणार असून सिंघू सीमेवरून कोणत्याही प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की कलम 144 लागू झाल्यामुळे आंदोलकांना ट्रॅक्टर, ट्रॉली, बस, ट्रक, व्यावसायिक वाहने, घोडे इत्यादींवर दिल्लीत येण्यास बंदी असेल. यासोबतच कोणालाही शस्त्रे, तलवारी, त्रिशूळ, काठ्या किंवा रॉड घेऊन दिल्लीत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Section 144 imposed on Delhi border tight security in the wake of farmers march

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात