‘भारत आमचा सर्वात विश्वासार्ह मित्र…’ शेख हसीना यांनी व्यक्त केली कृतज्ञता!

विरोधी पक्ष बीएनपी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याने हसीना यांची सत्ता कायम राहणे निश्चित आहे.


विशेष प्रतिनिधी

ढाक : बांगलादेशमध्ये कडेकोट बंदोबस्तात शांततेत मतदान सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान हसिना यांनी 1971 च्या मुक्तिसंग्रामात दिलेल्या मदतीचाही उल्लेख केला, ज्याने दोन शेजाऱ्यांमधील सखोल मैत्रीचा पाया घातला.India is our most reliable friend Sheikh Hasina expressed gratitude



न्यूज एजन्सी एएनआयने पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्या म्हणाल्या, ‘आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला भारतासारखा विश्वासू मित्र मिळाला आहे. आमच्या मुक्ती संग्रामात त्यांनी आम्हाला मदत केली. 1975 नंतर, जेव्हा आम्ही आमचे संपूर्ण कुटुंब गमावले, तेव्हा भारताने आम्हाला आश्रय दिला.

1975 च्या हिंसाचारात आपलं सर्वस्व गमावल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. येथून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा अवामी लीगची जबाबदारी स्वीकारली आणि आता त्या सलग चौथ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतील अशी अपेक्षा आहे.

सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी उत्सुक असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी ढाका सिटी कॉलेज मतदान केंद्रावर १२व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केले. विरोधी पक्ष बीएनपी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याने हसीना यांची सत्ता कायम राहणे निश्चित आहे.

India is our most reliable friend Sheikh Hasina expressed gratitude

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात