“आसाम हा कधीच म्यानमारचा भाग नव्हता” ; हिमंता बिस्वा सरमा यांचे कपिल सिब्बलांना प्रत्युत्तर

ज्यांना आसामच्या इतिहासाबद्दल काही माहिती नाही, त्यांनी बोलू नये. असंही सरमा म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान आसामला म्यानमारचा भाग म्हटल्याबद्दल वकील कपिल सिब्बल यांना फटकारले. नागरिकत्व कायदा, 1955 च्या कलम 6A च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांची ही टिप्पणी समोर आली होती. Assam was never a part of Myanmar Himanta Biswa Sarmas reply to Kapil Sibal

त्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्बा सरमा मीडियाशी बोलताना म्हणाले, “ज्यांना आसामच्या इतिहासाबद्दल काही माहिती नाही, त्यांनी बोलू नये. आसाम हा कधीच म्यानमारचा भाग नव्हता. तिथे थोड्या काळासाठी चकमकी झाल्या होत्या, म्यानमारशी फक्त तेच संबंध होते, नाहीतर मी असा कोणताही डेटा पाहिला नाही ज्यामध्ये असे म्हणता येईल की आसाम एक म्यानमारचा भाग होता. ”

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्बा सरमा आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्यातील शब्दिकयुद्ध मणिपूरच्या संघर्षादरम्यान समोर आले, जिथे म्यानमारमधील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा हिंसाचाराचे प्रमुख कारण बनला. गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेत्यांनी म्हटले आहे की, ईशान्येकडील राज्यातील अशांततेमागे अवैध स्थलांतरितांची घुसखोरी हे एक प्रमुख कारण आहे.

Assam was never a part of Myanmar Himanta Biswa Sarmas reply to Kapil Sibal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात