‘दहशतवादी केवळ मारण्यासाठी आले नव्हते, तर हमासप्रमाणे…’, इस्रायलच्या राजदूतांचं विधान!

  • मुंबईतील 26/11च्या हल्ल्याच्या १५ व्या वर्षपूर्तीनिमित्त केले विधान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी 2008 मध्ये याच दिवशी पाकिस्तानातून सागरी मार्गाने आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत दहशत माजवली होती. या दिवशी दहशतवाद्यांनी भारताला असा घाव दिला होता, जो लवकर विसरता येणार नाही.Terrorists did not come only to kill but like Hamas came to terrorize the statement of the ambassador of Israel

या दिवशी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 18 सुरक्षा जवानांसह 166 जणांना ठार केले होते. अशा परिस्थितीत इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी मुंबई हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त शोक व्यक्त केला आहे.



मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १५व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन म्हणाले की, मुंबईतील लोकांना दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले ही एक भयानक घटना आहे. जेव्हा लोक आपल्या घरात आरामात जीवन जगत होते, तेव्हा दहशतवादी हमाससारखी दहशत निर्माण करण्यासाठी आले होते. त्यांना हमासप्रमाणेच दहशत हवी होती. त्यांचा उद्देश केवळ मारणेच नाही तर दहशत निर्माण करणे आणि वाचलेल्यांना घाबरवणे हा देखील होता.

‘इस्रायल नेहमीच भारताच्या पाठीशी उभा राहिला’

इस्रायली राजदूत म्हणाले की, आम्ही भारतीयांना सांगत आहोत की इस्रायल नेहमीच भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे. जेव्हा दहशतवादाचा मुकाबला करायचा असतो तेव्हा आम्ही एकत्र काम करत असतो. तसेच, भारताच्या पंतप्रधानांचा उल्लेख करून ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी जशी दहशतवाद ही जागतिक समस्या आहे असे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जागतिक पातळीवर हातमिळवणी करावी लागेल. जगातील देश आणि स्वतंत्र जनतेला हातमिळवणी करून या लढाईसाठी प्रयत्न करावे लागतील.

Terrorists did not come only to kill but like Hamas came to terrorize the statement of the ambassador of Israel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात