प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतल्या टोल प्रश्नावर आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्री दादा भुसे आणि सरकारी अधिकारी यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक घेतली आणि त्यांना सरकारकडून 14 आश्वासने दिली. यात 44 टोल लवकर बंद करण्याचे तसेच टोल नाक्यांवर देखरेखी साठी कॅमेरे बसविण्याचे आश्वासन आहे. Raj Thackeray’s Shivtirtha; 44 tolls will be closed, 14 promises of the government to Raj Thackeray
गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरत असलेल्या टोलबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारने टोलवरून जी आश्वासने दिली, त्याबाबत राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे आणि अधिकारी यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
९ वर्षांपूर्वी टोलप्रश्नी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे गेलो होतो. तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की, टोलबाबत जो करार झाला आहे तो २०२६ पर्यंत आहे. मात्र या करारात जे बदल केले जाणे गरजेचे होते, ते अद्याप झालेले नाहीत. मुंबईच्या वेशीवर टोल दरवाढ झाल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता सरकारने मला काही आश्वासने दिली असून ती पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची मुदत मागितली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
सरकारची राज ठाकरेंना आश्वासने
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App