वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने बुधवारी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी 19 दिवसांनी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावरील निलंबन मागे घेतले.Adhir Ranjan Chaudhary Apologizes Before Privileges Committee; Suspended from Lok Sabha; PM Modi was criticized in the House
11 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.
विशेषाधिकार समितीसमोर हजर होऊन काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आणि सांगितले की, मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत, असे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
विशेषाधिकार समिती लोकसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव पाठवणार
अधिर रंजन चौधरी यांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे विशेषाधिकार समितीच्या सदस्याने सांगितले. लवकरच हा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवला जाईल.
अधीर रंजन यांनी 10 ऑगस्ट रोजी मणिपूर हिंसाचारावर भाष्य केले
10 ऑगस्ट रोजी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले होते – जिथे आंधळा राजा बसतो, तिथे द्रौपदीचे वस्त्रहरण होते. हस्तिनापूर असो वा मणिपूर, हस्तिनापूर आणि मणिपूरमध्ये फरक नाही. हे विधान संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले.
अमित शहा म्हणाले होते- पंतप्रधानांवर अशी विधाने करणे चुकीचे काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यावर अमित शहांनी आक्षेप घेतला. ते अध्यक्षांना म्हणाले – पंतप्रधानांबद्दल अशी विधाने करणे चुकीचे आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला होता, तो अध्यक्षांनी स्वीकारला.
विशेषाधिकार समितीसमोर खासदारांनी अधीर रंजन यांचा बचाव
यानंतर अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. तथापि, 18 ऑगस्ट रोजी समितीची बैठक झाली, ज्यामध्ये चौधरी म्हणाले होते – माझा उद्देश पंतप्रधानांचा अपमान करण्याचा नव्हता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App