विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर आयकर विभाग (आयटी) छापे टाकत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन अनिल परब यांच्याशी ते संबंधित आहेत. मुंबई आणि पुण्यात छापे टाकण्यात येत आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी छापा म्हणजे भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. ‘IT’ raids on Shiv Sena leaders Hammer on Aditya Thackeray and Anil Parab
शिवसेनेवर राजकीय बॉम्बगोळा : अनिल परब पोलिसांच्या बदल्यांची यादी द्यायचे; अनिल देशमुख यांचा ईडीच्या जबाबात दावा!!
आदित्य ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. केंद्रीय एजन्सी ही भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. केंद्रीय एजन्सी भाजपची प्रचार यंत्रणा बनल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही, असे आदित्य मंगळवारी म्हणाले. प्राप्तिकर विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या जागेची झडती घेतल्यानंतर हे वक्तव्य आले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, यापूर्वीही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. ते पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात झाले आणि आता महाराष्ट्रात होत आहे. केंद्रीय एजन्सी ही एक प्रकारे भाजपची प्रचार यंत्रणा बनली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही.
राऊत यांच्या मुली पूर्वाशी आणि विधीता यांच्या नावाने कंपनी आहे. त्यातील भागीदार सुजित पाटकर यांच्या घरांवरही ‘आयटी’ने छापे टाकले होते. 1034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी आयटी’ने गेल्या महिन्यात कारवाई केली.
यापूर्वीही राऊत यांनी भाजपशासित केंद्र सरकार केंद्रीय एजन्सीचा वापर करून पक्षाच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की केंद्रीय एजन्सी आमच्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देत आहेत. या एजन्सींचा वापर आमच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार १० मार्चला पडेल, असे भाजपचे काही नेते सांगत आहेत. मी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिल्यावर या सर्व अफवा सुरू झाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App