2,000 रहिवासी असलेले महाराष्ट्राचे एक छोटेसे गाव, परंतु स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल या गावाने उचलेले आहे
हे गाव भरपूर प्रशंसा मिळवत आहे कारण तेथील प्रत्येक घर हे घरातील स्त्रीच्या म्हणजेच ‘ती’ च्या मालकीचे आहे...
माधवी अग्रवाल
औरंगाबाद: आज जगभरात महिला दिन साजरा होत असताना, औरंगाबादपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या बकापूरमधील प्रत्येक घराच्या प्रवेश द्वारावर घराची मालकीण किंवा सह-मालक म्हणून ती चे नाव दिसते.औरंगाबाद जिल्ह्यातील एक छोटंसं गाव बकापुर… सुमारे 2,000 रहिवासी असलेले टुमदार खेडेगाव…गाव छोटंसं आहे पण इथला नियम मोठ मोठ्या शहरात देखील नाही .आणि ही गोष्ट निश्चितच विचार करायला लावणारी आहे .स्त्री पुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा न मारता इथल्या रहिवाश्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एक नवा आदर्श घालून दिला आहे .या गावात आल की नावाच्या पाट्या दिसणार आणि प्रत्येक पाटीवर दिसणार ती च नावं …घर मालकिणीच नावं …WOMEN’S DAY EXCLUSIVE: Big story in a small village! Aurangabad .. Bakapur – The owner of the house is not a single man – Malkini’s name on every house … Sarpanch is also a woman!
2008 मध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या विशेष तरतुदीमुळे हे शक्य झाले आहे.या गावात प्रत्येक घर एका महिलेच्या मालकीचे असल्याने लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी या गावाचं खूप कौतुक होत आहे.
आज जगभरात महिला दिन साजरा होत असताना, औरंगाबादपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या बकापूरमधील प्रत्येक घराच्या नावाच्या फलकावर घराची मालकीण किंवा सह-मालक म्हणून महिलेचे नाव दिसत असल्याने तेथील रहिवाशांना अभिमान वाटतो.
या गावातील एकही घर एकट्या पुरुषाच्या मालकीचे नाही, कारण ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार कुटुंबातील एक महिला सह-मालक असावी लागते.
The focus India सोबत बोलताना बकापूरच्या सरपंच कविता साळवे म्हणाल्या, “माझ्या गावातील महिलांना या निर्णयामुळे घरात समान अधिकार मिळाला आहे. त्यांच्या संमतीशिवाय पुरुष घर विकू शकणार नाहीत .”
2008 मध्ये हा निर्णय झाला तेव्हा सुदामराव पळसकर हे गावचे सरपंच होते.
“मागील काही अनुभवांच्या आधारे, त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला तिच्या निवासस्थानाची मालक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायतीत आमचे सात सदस्य होते. एकाही सदस्याने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले नाही. हा निर्णय गावातील प्रत्येक घरात सुरक्षितता आणि मुलांच्या भवितव्यासाठी महत्वाचा ठरला.असे पाहिले सरपंच पळसकर म्हणाले.
21 वर्षांपासून बकापूर येथे वास्तव्यास असलेले साळवे म्हणाले, पूर्वी येथे भीती होती की पुरुष त्यांच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय घरे विकू शकतील मात्र आता तसे नाही .याचा कुटुंबांवर आर्थिक परिणाम झाला असता. पण, घराची मालकीण महिलेला करण्याच्या निर्णयामुळे येथील महिलांना अधिकार आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आता घराशी संबंधित आर्थिक बाबींमध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
उपसरपंच अजिज शहा यांनी सांगितले की, यापूर्वी विविध व्यसनांच्या आहारी गेलेल्या काही पुरुषांनी घरे विकण्याचा प्रयत्न केला होता.परंतु, कुटुंबातील एका महिलेला घराची मालकी देण्याच्या निर्णयामुळे घरे सुरळीत चालली आहेत. एखाद्या व्यक्तीला बकापूरमध्ये घर घ्यायचे असले तरी, त्याला कुटुंबातील एका महिलेसोबत ते संयुक्तपणे खरेदी करावे लागेल.. .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App