Maharashtra Flood: पूरग्रस्त भागांमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा दौरा : टीका मात्र आशिष शेलारांवर! काय म्हणाले शरद पवार ?


  • महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. तळिये गावाला त्यांनी भेट दिली.

  • त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार आहेत. दौरा राज्यपालांचा पण टीका मात्र आशिष शेलारांवर केली जाते आहे. आशिष शेलार यांचं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निलंबन करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा विरोधी पक्षाने म्हणजेच भाजपने उचलून धरला होता. त्यानंतर पीठासीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना त्यांच्या दालनात धक्काबुक्की झाली आणि शिवीगाळ झाल्याचेही आरोप झाले. या घटनेनंतर ज्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्यापैकी एक आशिष शेलार आहेत.

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. पावसाचा तडाखा बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाचा त्यांनी दौरा केला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची कोश्यारी यांनी पाहणी केली. यावेळी कोकणातील चित्र विदारक असल्याचं सांगत या परिस्थितीत कोणतंही राजकारण केलं जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.Maharashtra Flood : Governor Bhagat Singh Koshyari’s visit to flood-hit areas: Criticism on Ashish Shelar! What did Sharad Pawar say?

जर कुणाला घेऊन जायचं होतं तर सरकारमधल्या एखाद्या व्यक्तीला का घेऊन गेले नाहीत राज्यपाल?

राजभवनाने राज्यपालांच्या दौऱ्याचा राज्यपालांनी दौऱ्यावर जात असताना आणि पूरग्रस्त भागांची माहिती आणि तेथील आढावा घेत असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला घेऊन जाणं अपेक्षित होतं त्यांनी तसं का केलं नाही असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं ?

राज्यपालांच्या दौऱ्याबाबत आणि त्यांच्यासोबत असलेल्या आशिष शेलारांबाबत जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवार म्हणाले की, ‘राज्यपालांना ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना ते घेऊन गेले, शेलारांवर त्यांचा विश्वास असेल. राज्यपाल दौरा करत आहेत त्यातून ते केंद्राकडून मदत आणतील अशी अपेक्षा आहे.’

पूरपरिस्थिती पाहून दु:ख होतंय, राजकारण केलं जाणार नाही, केंद्राकडून मदत नक्की केली जाईल.असं आश्वासन यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिलं .

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी 12 जिल्हे पूरग्रस्त झाले. तळये गावात तर आत्तापर्यंत 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Flood : Governor Bhagat Singh Koshyari’s visit to flood-hit areas: Criticism on Ashish Shelar! What did Sharad Pawar say?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात